CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुढील ५० वर्षांचा विचार करून भाविकांच्या सुविधा, गर्दीचे नियोजन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने हा आराखडा तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी हे नमूद केलं. वाढती भाविकसंख्या लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन व प्रवासाची सुविधा देण्यासाठी एकात्मिक नियोजनावर भर दिला जाणार आहे.



जुनी मंदिरे, मठांचे स्थलांतर नाही


पंढरपूरमधील जुनी मंदिरे आणि मठांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून विकास केला जाईल. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. विकास आराखड्यामुळे बाधित होणाऱ्या दुकानदार, रहिवासी आणि व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले जाईल. बाधितांना ‘जागेस जागा’ देण्याचे धोरण असून, ५०० हून अधिक बाधित कुटुंबांसाठी योग्य पर्याय उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.



स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देण्यावर भर


पंढरपूरचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनेही केला जाणार आहे. पुढील अनेक दशकांचा विचार करून पंढरपूर अधिक सुरक्षित, सक्षम आणि भाविकांसाठी सुलभ करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. स्थानिक नागरिक, आर्किटेक्ट्स आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा विचार करून शक्य त्या चांगल्या बाबी विकास आराखड्यात समाविष्ट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीत पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या प्रतिनिधींनीही विविध सूचना व मते मांडली.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा