Ahilyanagar Crime : वकील रियाज पठाण हत्या प्रकरणी लष्करे टोळीतील ७ जणांना मरेपर्यंत जन्मठेप

Ahilyanagar Crime : नेवाशातील बहुचर्चित वकील रियाज पठाण हत्या प्रकरणात तब्बल १३ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. वकील रियाज पठाण यांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या आरोपावरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने नेवाशातील लष्करे टोळीतील सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या खटल्यातील इतर पाच आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी शुक्रवारी (२८ ऑगस्ट) या बहुचर्चित खटल्याचा निकाल दिला. विशेष सरकारी वकील अ‍ॅड, उज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी या निकालाची माहिती दिली.(Ahilyanagar Crime News)



७ जणांना मरेपर्यंत जन्मठेप


या प्रकरणात प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे, रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण आणि सादिक बशीर शेख या सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी मोहन सुरेश लष्करे हा खटला सुरू असतानाच फरार झाला असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे कटामध्ये थेट आणि भक्कम सहभाग सिद्ध करणारा पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे आणि सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी या पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. (Ahilyanagar Crime News)



तब्बल १३ वर्षांनंतर निकाल


या संपूर्ण खटल्यात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. परिमल फळे तसेच पैरवी अधिकारी आणि पोलीस हवालदार महेश जोशी यांनी सहाय्य केले. या हत्याकांडाची घटना २०१३ मध्ये नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी घडली होती. त्यामुळे या प्रकरणाने त्यावेळी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.२०१३ मध्ये नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदिवसा घडलेल्या वकील रियाज पठाण हत्या प्रकरणाचा तब्बल १३ वर्षांनंतर निकाल लागल्याने या प्रकरणाला आता महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली आहे.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Ashok Kharat Case : मोठी अपडेट ! भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, सरकार पक्षातर्फे उज्ज्वल निकम बाजू मांडणार

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू