Water Purifier : दररोज सकाळी वॉटर प्युरिफायरचं पाणी पिण्याआधी ही गोष्ट नक्की करा!

मुंबई : सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकघरात जाऊन पिण्यासाठी तांब्या भरणे असो किंवा मुलांच्या शाळेच्या आणि ऑफिसच्या बाटल्या भरणे असो, आपण थेट वॉटर प्युरिफायरचा म्हणजेच (RO) नळ चालू करतो आणि पाण्याची टाकी रिकामी करायला लागतो. पण असं न करता सकाळी उठल्यावर प्युरिफायरच्या टाकीतलं पाणी काढून RO पूर्ण रिकामा करावा, असं करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? हे सविस्तर समजून घेऊया. (Water Purifier)


रात्री झोपण्यापूर्वी प्युरिफायरची टाकी पूर्ण भरलेली असते. रात्रभर घरातील सर्वजण झोपलेले असताना हे पाणी बंदिस्त टाकीत आणि पाईप्समध्ये तासनतास एकाच जागी साठवून ठेवलेलं राहतं. कोणत्याही नैसर्गिक प्रकाशाविना किंवा प्रवाहाविना प्लास्टिकच्या बंद पेटीत पाणी साचून राहिल्यामुळं त्याची मूळ ताजी गुणवत्ता आणि ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागतं. (Water Purifier)



जेव्हा पाणी अनेक तास प्लास्टिकच्या टाकीत राहतं, तेव्हा टाकीच्या आतील पृष्ठभागावर 'बायोफिल्म' (सूक्ष्म जिवाणू आणि शेवाळासारखा सूक्ष्म थर) तयार होण्यास पोषक वातावरण मिळतं. दिवसभर पाणी सतत वापरलं जात असल्यानं हा थर जाणवत नाही, पण रात्रभर साचून राहिलेल्या पाण्यात हे जिवाणू वेगानं वाढू लागतात. अनेक तास फूड-ग्रेड प्लास्टिकच्या टाकीत पाणी राहिल्यामुळं सकाळी त्या पाण्याला हलका प्लास्टिकसारखा पाण्याचा वास येतो. या शिळ्या पाण्याच्या पहिल्या घोटामुळे पचनाच्या तक्रारी, ॲसिडिटी किंवा घशात खवखव जाणवण्याचा धोका निर्माण होतो. (Water Purifier)


पाणी रात्रभर स्थिर राहिल्यानं त्यातील सूक्ष्म क्षार आणि बारीक घटक टाकीच्या अगदी तळाशी जाऊन बसतात. सकाळी नळ चालू करताच टाकीच्या तळाशी साचलेला हा जड पाण्याचा थर थेट तुमच्या पहिल्या ग्लासात किंवा पाण्याच्या बाटलीत उतरतो. जो साहजिकच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो.


त्यामुळे सकाळी उठल्यावर वॉटर प्युरिफायरमधील रात्रभर साठलेलं पाणी काढून टाकी पूर्णपणे रिकामी करणं आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. टाकीतील रात्रभर साचलेला प्लास्टिकचा वास आणि सूक्ष्म जिवाणू बाहेर पडतात मशीन नव्यानं सुरू होऊन संपूर्ण दिवसासाठी तुमच्या कुटुंबाला 100% ताजं, शुद्ध आणि नव्यानं फिल्टर झालेलं पाणी मिळतं. (Water Purifier)


सकाळी प्युरिफायर रिकामं करताना बाहेर पडणारं पाणी साधं पिण्यायोग्य नसलं, तरी ते पूर्णपणे स्वच्छ असतं. त्यामुळं ते गटारात फेकून न देता घरातील झाडांना घालता येऊ शकतं. लादी पुसण्यासाठी किंवा भांडी विसळण्यासाठीही या पाण्याचा वापर करता येतो.

Comments
Add Comment

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

Nashik : माणुसकीला काळिमा ! पैशांसाठी ५ दिवसांच्या नवजात बाळाचा आईनेच केला सौदा

Nashik Crime News : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना

Instant Sweet Recipes for Festivals : सणासुदीच्या दिवसात घरच्या घरी बनवा या इन्स्टंट मिठाईचे प्रकार; कमी वेळात तयार होईल गोड मेजवानी!

मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाले की घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Self Improvement : तुम्ही कोणाचंच वाईट करत नाही, तरीही लोक तुम्हाला एकटं पाडतात? 'या' चुका ठरतात कारणीभूत

तुम्ही कोणाचं वाईट करत नसतानाही लोक तुमच्यापासून दुरावत असतील, तर त्याला तुमच्या नकळत