Mohan Bhagwat : ‘धर्म वेगळे असू शकतात, पण मानवता एकच’; मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधून मोहन भागवत यांचा एकतेचा संदेश

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधून जगाला एकता आणि मानवतेचा संदेश दिला. ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात विविध धर्मांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. ‘द अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या वेळी मोहन भागवत यांनी विविधता, एकता आणि मानवतेवर भाष्य केले. “धर्म वेगळे असू शकतात, पण भावना एकच असते. आपण दिसायला वेगवेगळे असलो तरी मुळात एकच आहोत. भारताच्या DNA मध्ये एकता आहे. आपण कसा विचार करतो, हे आपले भवितव्य ठरवते. आपण एकच आहोत, हे स्वीकारले पाहिजे,” असे ते म्हणाले. (Mohan Bhagwat)



‘विविधतेत एकता’ भारताच्या DNA मध्ये :


अमेरिका आणि भारताच्या सामाजिक रचनेचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, अमेरिकेबाबत बोलताना ‘प्लुरॅलिझम’ म्हणजेच बहुविधता हा शब्द वारंवार वापरला जातो. तर भारताच्या बाबतीत ‘विविधतेत एकता’ ही संकल्पना अधिक ठळकपणे समोर येते. भारतातील नागरिकांच्या DNA मध्ये विविधता आणि एकता या दोन्ही गोष्टी रुजलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. (Mohan Bhagwat)



‘नर नारायण होऊ शकतो’ :


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे नागरिक उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की, राष्ट्र केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नसते. विश्वाच्या व्यापक रचनेत प्रत्येक राष्ट्राची विशिष्ट भूमिका आणि जबाबदारी असते. स्वामी विवेकानंद यांनीही प्रत्येक देशाचे एक विशिष्ट ध्येय असल्याचे सांगितले होते. “नर चाहे तो नारायण बन सकता है,” असे सांगत त्यांनी मानवाच्या क्षमतेवर भर दिला. जगात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी माणूसच जबाबदार असतो, असेही त्यांनी नमूद केले. (Mohan Bhagwat)



‘विचार कसा करता, हे महत्त्वाचे’ :


मानवाला विचार करण्याची क्षमता मिळाली आहे आणि ही मोठी देणगी आहे. मात्र केवळ विचार करण्याची क्षमता असणे पुरेसे नाही, तर आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो हे अधिक महत्त्वाचे आहे, असे भागवत यांनी सांगितले. “जर तुम्ही योग्य पद्धतीने विचार केला, तर तुम्ही देवाच्या जवळ जाता. चुकीच्या पद्धतीने विचार केला, तर तुम्ही प्राण्यांच्या जवळ जाता. काही चुकीचे वाटत असेल, तर सत्याचा शोध घ्या,” असे ते म्हणाले. (Mohan Bhagwat)



जगाला एकतेचा संदेश देणे हे भारताचे काम :


भारताची भूमिका स्पष्ट करताना मोहन भागवत म्हणाले की, आपण सर्वजण एकच आहोत, हा संदेश जगाला देणे हे भारताचे काम आहे. विविधता ही एकतेला कमकुवत करत नाही, उलट ती एकतेचे सौंदर्य वाढवते, असे त्यांनी स्पष्ट केले. (Mohan Bhagwat)



भौतिक सुख कायम समाधान देत नाही :


भौतिक सुखाच्या मागे धावण्याबाबतही भागवत यांनी उदाहरण देत भाष्य केले. न्यूयॉर्कमधील डोनटचे उदाहरण देताना ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला एखादा पदार्थ कितीही आवडत असला तरी त्याची एक मर्यादा असते. काही काळानंतर त्याच पदार्थाचा आनंद कमी होतो आणि पुन्हा त्याच गोष्टीची इच्छा निर्माण होते. भौतिक सुख हे तात्पुरते असते आणि त्यातून कायमस्वरूपी समाधान मिळत नाही, असा संदेश त्यांनी या उदाहरणातून दिला. माणसाने केवळ भौतिक सुखाच्या मागे न धावता जीवनातील खऱ्या समाधानाचा आणि सत्याचा शोध घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. (Mohan Bhagwat)


Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.