Nashik : नेपाळमधील महाप्रलयाची दृश्ये पाहून अंगावर अक्षरशः शहारे येत होते. अशा भीषण परिस्थितीत नेपाळमध्ये दर्शनासाठी आणि मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या नाशिकमधील २०० भाविकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. आपल्या आप्तेष्टांच्या परतीची कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत होते. अखेर भाविक सुखरूप नाशिकमध्ये दाखल होताच नातेवाइकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
प्रशासकीय कामकाज अधिक मजबूत आणि सुव्यवस्थित करण्यासाठी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची आपल्या ...
महाप्रलयातून २०० नाशिककर सुखरूप परतले
नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरासह विविध तीर्थक्षेत्रांच्या यात्रेसाठी गेलेले तब्बल २०० यात्रेकरू मंगळवारी सकाळी सुखरूप नाशिकमध्ये परतले. मुंबई नाका येथे श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात या भाविकांचे जंगी स्वागत करण्यात आले. आपल्या आप्तेष्टांना सुखरूप पाहून भाविकांसह त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. भरपावसातही अनेकांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.
श्री औदुंबर भक्त मंडळाच्या वतीने दरवर्षी दत्त महाराजांच्या पादुकांसह भाविकांसाठी अल्प दरात तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक नेपाळ यात्रेसाठी गेले होते. मात्र, नेपाळमध्ये अचानक निर्माण झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि यात्रेकरू तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंडळाच्या सेवेकऱ्यांनी तत्काळ सतर्कता बाळगत यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून भाविकांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले. अखेर सर्व यात्रेकरू सुरक्षितपणे भारतात परतण्यास यशस्वी झाले.
Nashik Crime News : नाशिकमधून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या गंगापूर रोडवरील कोट्यवधी रुपये किमतीच्या तब्बल १४ ...
अन् नातेवाइकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले
यात्रेकरूंच्या बस नाशिकमधील मुंबई नाका परिसरात दाखल होताच मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, भाविक आणि मोठ्या संख्येने नातेवाईकांनी जल्लोष केला. ढोल-ताशांचा गजर करत अनेकांनी भाविकांचे औक्षण करून स्वागत केले. काही दिवसांपासून मनात असलेली चिंता दूर झाली आणि आपल्या आप्तेष्टांना सुखरूप डोळ्यांसमोर पाहताच अनेक नातेवाइकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. भाविकांच्या सुखरूप परतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.