Thursday, September 3, 2026

Mumbai To Sawantwadi : गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठे गिफ्ट! मुंबई ते सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सेवा आजपासून सुरू; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

Mumbai To Sawantwadi : गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठे गिफ्ट! मुंबई ते सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सेवा आजपासून सुरू; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) ते सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) दरम्यान धावणाऱ्या नवीन नियमित (दैनिक) एक्सप्रेस ट्रेनचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी लक्षात घेऊन ही नवी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दैनिक रेल्वेमुळे मुंबई-कोकण प्रवास अधिक गतिमान, आरामदायी आणि सोयीस्कर होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात या नव्या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) हजेरी लावली. तर प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे, (Nitesh Rane) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी या रेल्वे सेवेसाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला अखेर मोठे यश मिळाले आहे.

कोकणवासियांसाठी ठरणाऱ्या महत्त्वाच्या बाबी

ही ट्रेन नियमितपणे दररोज धावणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी धावपळ थांबणार आहे. सावंतवाडी आणि दक्षिण कोकणातील प्रवाशांना मुंबईला येण्या-जाण्यासाठी आता हक्काची आणि थेट गाडी उपलब्ध झाली आहे. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल. गणपती उत्सवाच्या काळातच ही बहुप्रतिक्षित रेल्वे सेवा सुरू झाल्याने संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण पसरले असून चाकरमान्यांनी सरकार आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >