Nashik Crime : सद्दाम शेखच्या अडचणी वाढल्या ! अपहरण, मारहाण आणि ५० लाखांच्या खंडणीचा दुसरा गंभीर गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिकमध्ये पोलिसांवर आरोप करून चर्चेत आलेल्या संशयित सद्दाम शेखच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता सद्दाम शेख आणि त्याची आई लता बर्डे यांच्याविरोधात अनधिकृत सावकारी, अपहरण, मारहाण आणि तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गंभीर गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) दाखल झाला आहे. अमृतधाम येथील व्यावसायिक विजय पुंडलिक शिरोडे यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.


मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न


फिर्यादीनुसार, २०२१ पासून सद्दाम बाबू शेख आणि त्याची आई लता बर्डे हे बेकायदेशीरपणे सावकारीचा व्यवसाय करत असल्याचा आरोप आहे. शिरोडे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सद्दाम आणि त्याच्या आईकडून २० लाख रुपये घेतले होते. मात्र, या २० लाख रुपयांच्या मुद्दलावर तब्बल ४८ लाख रुपये व्याज म्हणून वसूल करण्यात आले. एवढी रक्कम दिल्यानंतरही पैशांची मागणी सुरूच असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. काही दिवसांपूर्वी शिरोडे यांना भगवती हॉटेल परिसरात बोलावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी त्यांना मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यानंतर शिरोडे यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आले आणि अमृतधाम परिसरातील गोल्डस्टार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे तब्बल चार तास डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी मुद्दल आणि व्याजाची रक्कम अद्याप बाकी असल्याचे सांगत शिरोडे यांच्याकडे आणखी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. पैसे न दिल्यास शिरोडे आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.


ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी


मात्र, प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही.शिरोडे यांच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक २६१/२ मधील प्लॉटच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्याचा आरोपही सद्दाम शेख आणि लता बर्डे यांच्यावर करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, भीतीचे वातावरण निर्माण करून संबंधित कागदपत्रांवर सह्या करून घेण्यात आल्या आणि त्यानंतर प्लॉटवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यात आला. याशिवाय, हा प्लॉट ताब्यात घेण्यास विरोध केल्यास सद्दाम शेखच्या सांगण्यावरून खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक कैलास जाधव पुढील तपास करत आहेत.


शहर पोलिसांवर गंभीर आरोप


काही दिवसांपूर्वी सद्दाम शेखने शहर पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी घरझडतीच्या बहाण्याने आपला छळ केल्याचा आणि बेकायदेशीरपणे बसवून ठेवल्याचा आरोप त्याने केला होता. मात्र, त्यानंतर के. के. वाघ ॲग्रीकल्चर कॉलेजसमोरील कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून श्रीकांत कुलकर्णी यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सद्दाम शेखविरोधात गुन्हा दाखल झाला. या पहिल्या गुन्ह्यानंतर आता पंचवटी पोलीस ठाण्यात अवैध सावकारी, अपहरण, मारहाण आणि ५० लाख रुपयांच्या खंडणीच्या आरोपांखाली दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सद्दाम शेखविरोधातील प्रकरणांची व्याप्ती वाढताना दिसत आहे. दरम्यान, सद्दाम शेख याच्याविरोधात दाखल झालेल्या या दुसऱ्या गुन्ह्यामुळे त्याची कथित गुन्हेगारी पार्श्वभूमी पुन्हा चर्चेत आली आहे.
Comments
Add Comment

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा

google gemini 3 8 flash : गूगलचा सर्वात मोठा धमाका! 'Gemini 3.8 Flash' लाँच; कोडिंग स्पीड पाहून जग चक्रावले

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील तीव्र स्पर्धेत गूगलने आपले स्थान पुन्हा भक्कम केले आहे. OpenAI आणि

Ashwini Paul : स्वतः राष्ट्रीय कुस्तीपटू, MSF मध्ये नोकरी अन् नवरा मात्र...अश्विनी पौळ यांच्या निर्णयामागील 'ते' मोठे कारण आले समोर

धाराशिव : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग

Rojgar Mahakumbh : मुंबईत २९ सप्टेंबरला रोजगाराचा 'महाकुंभ'; पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' अंतर्गत शहरात १० ठिकाणी भव्य मेळावे

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई

Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा दणका ! १४ बँक खाती गोठवली

Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. जमीन संपादनाच्या

Bhandara gad news : भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा महिनाभरात अहवाल सादर करा; सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पावन तपोभूमी असलेल्या देहूजवळील भंडारा आणि भामचंद्र गडाच्या