Nashik : सृष्टीच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागं, कळवणच्या आश्रमशाळांतील २४ विद्यार्थी एकाच दिवशी रुग्णालयात दाखल

Nashik : नाशिकच्या कळवण तालुक्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध आश्रमशाळांमधील तब्येत बिघडलेल्या तब्बल २४ विद्यार्थ्यांना एकाच दिवशी कळवण उपजिल्हा रुग्णालयात (Kalwan Sub-District Hospital) दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला तसंच संसर्गजन्य आजारांसारखी लक्षणं आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Nashik Kalwan News)



पाच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश


रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निवाणे, विसापूर, मानूर, मोहनदरी आणि नाकोडे येथील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये इयत्ता पहिलीपासून नववीपर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालय परिसरातही काही काळ गर्दीचं वातावरण पाहायला मिळालं. (Nashik Kalwan News)



सृष्टीच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागं


दरम्यान, शुक्रवारी सकाळी विसापूर आश्रमशाळेतील (Visapur Ashram School) आठ वर्षीय सृष्टी सूर्यवंशी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विकास प्रशासनाकडून आश्रमशाळांमधील आरोग्य व्यवस्थेकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे. सृष्टीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत सध्या अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. प्राथमिक अंदाजानुसार तापामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, शवविच्छेदन आणि अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. (Nashik Kalwan News)



विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा चर्चेत


सृष्टीच्या मृत्यूनंतर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते का ? आजारी विद्यार्थ्यांकडे वेळेत लक्ष दिलं जातं का? आणि गरज भासल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जातं का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये अनेक विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, आजारी विद्यार्थ्यांसाठी योग्य व्यवस्था आणि आवश्यकतेनुसार तातडीने वैद्यकीय उपचार मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.


विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी ताप, सर्दी, खोकला किंवा संसर्गजन्य आजारांची लक्षणं आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनंतर विविध आश्रमशाळांमधील आजारी विद्यार्थ्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार, दिवसभरात एकूण २४ विद्यार्थी उपचारासाठी दाखल झालेत. (Nashik Kalwan News)



पालकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही


दरम्यान, कळवण उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. जनक पूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याच्या तक्रारी आहेत. हे आजार हवेतून पसरणारे असून पावसाळ्यात अशा प्रकारचे आजार सहज होऊ शकतात. सर्व विद्यार्थी सध्या सुस्थितीत असून पालकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच परिसरात एखादा वेगळा किंवा गंभीर आजार पसरला असल्याची भीती बाळगू नये, असंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Pune News : पुण्यात दहीहंडीचा सांगाडा काढताना भीषण अपघात; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे : पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढताना भीषण अपघात झाला.

Nashik Mhada Scam : नाशिकच्या म्हाडा घोटाळ्यात मोठी कारवाई ! १३ अधिकारी-कर्मचारी निलंबित तर मनपातील १५ जणांवर कारवाईची टांगती तलवार

Nashik Mhada Scam : नाशिकमधील बहुचर्चित सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घोटाळ्याच्या चौकशीला आता वेग आला आहे. या

Dahihandi 2026 : दहीहंडीच्या थरावर साकारली पावनखिंड; मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाच्या देखाव्याला दादरकरांची उत्स्फूर्त दाद

मुंबई : राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून, मुंबईतही ठिकठिकाणी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे

BMC Engineers Transfer : महापालिकेतील प्रमुख अभियंत्यांच्या बदल्या

पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण आणि इमारत परिरक्षण विभागात फेरबदल मुंबई (विशेष प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या

Mumbai Water Crisis : पाण्याच्या तक्रारींमागील कारणे शोधा, तक्रारींचे निराकारण झाल्यानंतर स्थानिकांशी संवाद साधा

महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या विविध

DahiHandi 2026 : दहिहंडी उत्सवासाठी संभाव्य जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी महापालिका रुग्णालयात व्यवस्था 

मोफत वैद्यकीय उपचार करणार, अतिरिक्त  आयुक्त (शहर)  प्राजक्ता  लवंगारे यांचे निर्देश तब्बल १०० हून अधिक रूग्ण खाटा