Crime News : माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून पतीकडून मारहाण? २३ वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल...

छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी माहेरच्यांनी तब्बल १२ लाख रुपये खर्च केल्यानंतरही चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या मागणीवरून विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाला अवघे पाच महिनेही पूर्ण झाले नसताना पतीकडून मारहाण आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्याच्या आरोपातून निकिता ऋषिकेश वाकळे (२३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सुरेवाडी, जाधववाडी येथे घडली. आत्महत्येपूर्वी निकिता यांनी आईला फोन करून ‘तुझी काळजी घे’, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. (Crime News)


या घटनेनंतर निकिता यांच्या अंत्यविधीदरम्यान हडको एन-११ येथील स्मशानभूमीत माहेर आणि सासरच्या नातेवाइकांमध्ये वाद झाला. आरोप-प्रत्यारोप वाढल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आणि दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.


निकिता यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हसूल पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती ऋषिकेश सोमीनाथ वाकळे (२६), सासू रेखा सोमीनाथ वाकळे, सासरे सोमीनाथ कचरू वाकळे (५३), दीक्षा तांबे (२९), दीर सुमित सोमीनाथ वाकळे (२०), अनिता दामोदर पवार (३५) आणि मंदा हरिदास दारकुंडे (३३), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी ऋषिकेश वाकळे याला ताब्यात घेतले आहे. (Crime News)



चारचाकीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा


निकिता यांचे वडील गणेश अर्जुन पठारे हे बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथे राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, निकिता आणि ऋषिकेश यांचा चार ते पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबीयांनी मोठा खर्च केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच निकिताला सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप आहे.


चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, अशी मागणी पती ऋषिकेश करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लग्नात आधीच मोठा खर्च झाल्याने निकिताने आणखी पैसे आणण्यास नकार दिला. त्यानंतर पतीने तिच्यासोबत मारहाण केली, तर घरगुती कारणांवरून सासरच्या अन्य मंडळींकडूनही मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. (Crime News)



आईला फोन करून म्हणाल्या, ‘तुझी काळजी घे’


सासरच्या मंडळींकडून होत असलेला त्रास वाढत गेल्याने निकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी निकिता यांनी आईला फोन करून ‘तुझी काळजी घे’, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.


निकिता या मूळच्या देव पिंपळगाव येथील रहिवासी असून त्या बीएस्सीचे शिक्षण घेत होत्या. त्यांचा विवाह जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथे राहणाऱ्या ऋषिकेश वाकळे याच्याशी झाला होता. ऋषिकेश हा शहरातील एका धर्मादाय रुग्णालयात ‘ब्रदर’ म्हणून काम करतो. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच निकिताला सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी हसूल पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपांची चौकशी केली जात आहे. (Crime News)

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; कोकणवासीयांसाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या

Ashish Shelar : आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची कामे, निर्धारित कालावधीत पूर्ण करावी; मंत्री आशिष शेलार यांनी दिले निर्देश

नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सांभाळण्यासाठी नागपूर

Mahatma Gandhi Biopic : गांधीजींच्या भूमिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करणारा हा अभिनेता आहे तरी कोण...? फर्स्ट लूक भलताच चर्चेत!

मुंबई : असंख्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा आहेत, ज्या पडद्यावर साकारण्याचं स्वप्न अनेक कलाकार पाहतात. छत्रपती

Shafali Verma : शफाली वर्मा ठरली ३,००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू

दुबई : भारताची स्टार सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने इतिहास रचला. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,०००

ISRO Privatization : इस्रोमध्ये मोठा बदल? ९ कर्मचारी संघटना एकवटल्या; खासगीकरणावर मागितली ‘लिखित स्पष्टता’

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढत असताना, ISROच्या नऊ कर्मचारी संघटनांनी

Delhi Building Collapse updated :दिल्लीच्या सत्य निकेतनमध्ये इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, विद्यार्थ्यांसह अनेक जण अडकल्याची भीती

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक बहुमजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या