Pratap Sarnaik : सरनाईकांच्या कानपिचक्यांनी... एसटीची गाडी रुळावर; ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम


मुंबई : एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण आढावा बैठका आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या कानपिचक्यांचा सकारात्मक परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. आगामी काही महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून काढण्याच्या दिशेने महामंडळाची वाटचाल सुरू असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.



एसटीचे प्रत्येक आगार हे त्या परिसरातील सर्वसामान्य जनतेला प्रवासी सेवा देण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक प्रवासी १०० किलोमीटरच्या आतील अंतरात प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक आगाराने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांची गरज ओळखून त्यानुसार वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत याकडे अपेक्षित लक्ष न देता लांब पल्ल्याच्या, तुलनेने अनुत्पादक फेऱ्यांवर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होऊन एसटीच्या तोट्यात भर पडत होती. मागील महिन्यात उत्पन्नवाढीचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी ही बाब स्पष्टपणे निदर्शनास आणून दिली होती.


त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक आगाराने प्रवाशांची प्रत्यक्ष उपलब्धता आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील दररोज प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर आठवडी बाजार, यात्रा-जत्रा तसेच स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फेऱ्याही वाढविण्यात आल्या.



३१ ऑगस्टला एसटीचे विक्रमी उत्पन्न


विविध उपाययोजनांसह रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट रोजी एसटीला आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन उत्पन्न मिळाले. एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. विशेष म्हणजे, एसटीच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. सध्या एसटीला दररोज सरासरी ३४ ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांची ‘हनुमान उडी’ घेत एसटीने विक्रमी उत्पन्न मिळवले. प्रवाशांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे करण्यात आलेले नियोजन यामागील प्रमुख कारण ठरले आहे. ऑगस्ट महिन्यात प्रथमच एसटीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्न मिळवले आहे. उत्पन्नवाढीचा हा कल कायम राहिल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून निघण्याची शक्यता आहे.


‘जिथे प्रवासी, तिथे एसटीची फेरी’ या भूमिकेतून करण्यात आलेल्या बदलांचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. अर्थशास्त्रातील ‘मागणी तसा पुरवठा’ या मूलभूत तत्त्वाचा अवलंब करत ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्या मार्गांवर बसफेऱ्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. “एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गरजेनुसार एसटीची सेवा पोहोचली पाहिजे. अनुत्पादक फेऱ्यांपेक्षा प्रवासी उपलब्ध असलेल्या मार्गांवर अधिक फेऱ्या चालविणे, हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र आहे. ऑगस्ट महिन्यात झालेली ६६ कोटी रुपयांची उत्पन्नवाढ ही योग्य दिशेने सुरू झालेल्या बदलाचे द्योतक आहे. भविष्यातही प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन केले, तर एसटीला किमान तोटा होणार नाही, इतके उत्पन्न दर महिन्याला मिळविणे शक्य होईल,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Jai Jawan Govinda Pathak : सलग 4 वेळा प्रयत्न, तरीही जय जवान अपयशी! यंदा दहीहंडीत नक्की काय बिनसले?

 मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांनी उंच मानवी

DahiHandi 2026 : मुंबईत गोविंदा अपघातांची ताजी आकडेवारी समोर; जखमी गोविंदांचा आकडा 376 वर; 286 जणांना डिस्चार्ज

मुंबई : मुंबईत (Mumbai) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची

Mumbai Fire : मुंबईत मध्यरात्री दोन ठिकाणी आगीच्या घटना; धारावीत गॅस सिलिंडरच्या भडक्यात दोन मुलांसह चार जण जखमी

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज 6 सप्टेंबर मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द

मुंबई :  आज रविवार 6 सप्टेंबर रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी

DahiHandi 2026 : गोविंदा दुर्घटना अपडेट: केईएम रुग्णालयात सर्वाधिक जखमी; मुंबईतील रुग्णालयांची आकडेवारी समोर

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी मुंबईत सर्वत्र उत्साहाचे वाता

DahiHandi 2026 : महापौर रितू तावडेंच्या दहीहंडी उत्सवांना भेटी; KEM रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची केली विचारपूस

मुंबई : मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी