तिरुवनंतपुरम : कोच्चीहून अबू धाबीकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ५० मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे माघारी परतावे लागले. विमानाच्या एका इंजिनमधील ऑईल प्रेशर धोकादायक पातळीवर पोहोचल्याने वैमानिकांनी खबरदारीचा निर्णय घेत विमान कोच्ची येथील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग झाल्याने मोठा अनर्थ टळला.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेतील ‘न्यू ...
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स ४१५ हे बोईंग ७३७ विमान कोच्चीहून अबू धाबीच्या दिशेने रवाना झाले होते. उड्डाणानंतर सुमारे ५० मिनिटांनी हे विमान तब्बल ३६ हजार फूट उंचीवर असताना पायलट आणि को-पायलट यांच्या लक्षात इंजिन क्रमांक एकमधील तेलाची पातळी वेगाने कमी होत असल्याचे आले. तेलाची मात्रा कमी होत असतानाच इंजिनमधील ऑईल प्रेशरही धोकादायक पातळीवर पोहोचले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैमानिकांनी संबंधित इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान अबू धाबीपर्यंत नेण्याऐवजी पुन्हा कोच्चीकडे वळवण्यात आले. विमानातील क्रूने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोर्डेक म्हणजेच ‘फोर्डेक’ प्रक्रियेनुसार तपासणी केली. या प्रक्रियेत परिस्थिती, पर्याय, जोखीम आणि निर्णय यांचा विचार करून पुढील कृती निश्चित केली जाते. त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विमान कोच्ची विमानतळावर परत आणण्यात आले. विमानतळावर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती आणि विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात एक नवी आणि मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च ...
दरम्यान, विमानाच्या इंजिनमधील तेलाची पातळी अचानक का कमी झाली आणि ऑईल प्रेशर धोकादायक पातळीवर जाण्यामागचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या तांत्रिक बिघाडाची तपासणी केली जात असून, तपासणीनंतरच घटनेमागचे अचूक कारण समोर येण्याची शक्यता आहे.






