मुंबई : परिशिष्ट-२ नंतर अपात्र ठरलेल्या झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे अभय योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी योजनेचा विस्तार करण्याचे निर्देश पालकमंत्री, मुंबई उपनगर तसेच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Ashish Shelar)
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक आणि जागतिक वारसा महत्त्व लक्षात घेता, किल्ला परिसरातील अनधिकृत ...
सन २००० पूर्वीच्या तसेच सन २००० ते २०११ या कालावधीतील झोपडीधारकांना, केवळ हस्तांतरणाच्या कारणामुळे अभय योजनेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री शेलार यांनी दिल्या. या निर्णयामुळे पात्र झोपडीधारकांना अभय योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. (Ashish Shelar)
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत खेळाडूंच्या शासकीय, निमशासकीय तसेच इतर क्षेत्रातील नोकरीसाठीच्या ५ टक्के आरक्षणाबाबत ...
सन २००० ते २०११ दरम्यानच्या सशुल्क पात्र-अपात्र झोपडीधारकांचाही अभय योजनेत समावेश करून त्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले. या निर्णयामुळे सुमारे २५ हजार वंचित झोपडीधारकांना अभय योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या पुनर्वसनाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. (Ashish Shelar)