Crime News : अरे देवा... ! लग्न झालं, पण नववधू सासरी पोहोचलीच नाही ! वराला रस्त्यात उतरवून...

UP Crime News : लग्नानंतर नववधूसोबत सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या वराला धक्कादायक फसवणुकीचा सामना करावा लागलाय. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये लग्न झाल्यानंतर नववधू सासरी जाण्याऐवजी वराला भररस्त्यात गाडीतून उतरवून दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांसह सात जणांना अटक केली आहे. (UP Crime News)



व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून लग्नाचं आमिष


पोलिसांच्या माहितीनुसार, हरदोई जिल्ह्यातील बिलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छिबरामऊ गावातील रहिवासी राजकुमार याला काही जणांनी लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं. यासाठी त्यांनी राजकुमारला एका मुलीचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला. मुलगी पसंत पडल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी लग्न ठरवलं. त्यानंतर बरदह येथील महादेव मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. (UP Crime News)



मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्न


बरदहच्या महादेवाच्या मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी वधू आणि वरपक्षाचे लोक त्या मंदिरात पोहोचले. तिथे राजकुमरा यांचं त्या मुलीशी अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न पार पडलं.लग्नावेळी वरपक्षाकडून वधूला सोन्याचे दागिने, ८० हजार रुपयांची रोख रक्कम, साड्या आणि इतर कपडे देण्यात आले. लग्नानंतर राजकुमार वधूसोबत घरी निघाला. मात्र, बंधवा वळणाजवळ वधूच्या कथित वडिलांनी आणि इतर साथीदारांनी गाडी थांबवली. यानंतर त्यांनी राजकुमारला गाडीतून खाली उतरवलं. वधू, लग्नात मिळालेले दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन सर्वजण तिथून पसार झाले. या प्रकारामुळे वरपक्षाला मोठा धक्का बसला. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (UP Crime News)



दोन महिलांसह सात जणांना अटक


तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. शुक्रवारी कोदहरा परिसरात कारवाई करत या फसवणुकीत सहभागी असलेल्या दोन महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून १९ हजार ६५० रुपयांची रोख रक्कम, मंगळसूत्र, कानातले, साड्या, कपडे, दोन दुचाकी आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे फसवणूक केली आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Comments
Add Comment

PM Modi's call at the BRICS Summit : ग्लोबल साउथने आता नियम पाळणारे नव्हे तर 'नियम बनवणारे' व्हावे! – ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी मुंबई : संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सुरक्षा परिषदेत आता अजिबात विलंब न करता लवकरात लवकर सुधारणा केल्या पाहिजेत,

BRICS Summit 2026 : भारताच्या कूटनीतीला मोठं यश ! इथिओपिया-मलेशियासोबत महत्त्वाचे करार, खाणकाम आणि सेमीकंडक्टर क्षेत्राला नवी दिशा

BRICS Summit 2026 : भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८ व्या BRICS शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

BRICS Summit : BRICS परिषदेसाठी शी जिनपिंग भारतात दाखल ! शी जिनपिंग भारतात काय काय घेऊन आले ?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या BRICS परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल

मोदी-जिनपिंग भेटीदरम्यान मोठी घडामोड! ६ वर्षांचा दुरावा संपला, भारत-चीन विमानसेवा पुन्हा सुरू

नवी दिल्ली: भारत आणि चीन दरम्यानचे राजनैतिक आणि आर्थिक संबंध पुन्हा एकदा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे

Assam Elephant Rescue : टायरच्या विळख्यात अडकला हत्ती; वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी वाचला जीव!

आसाम : गोलाघाट जिल्ह्यात एका जंगली हत्तीच्या मानेभोवती ट्रॅक्टरचा मोठा टायर अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली

Nanded accident : नांदेडच्या भीषण अपघाताने देश हादरला! पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख, जखमींना ५० हजारांची मदत

नांदेड जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाट परिसरात