मियामी: फुटबॉल विश्वाचा महानायक आणि महान खेळाडू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या नावावर एका विक्रमी टप्प्याची नोंद केली आहे. नू स्टेडियमवर ...
४,६६,८०२ रूपये किंमतीचा आणि २,५८०.७ किलो व १२.५ लिटर इतर अन्नपदार्थाचा (दुग्धजन्य पदार्थ, सुपारी, विविध नमकीन व ताडी) साठा जप्त करण्यात आला आहे. सोबतच, ग्राहक तक्रारीवरून कुलाबा येथील 'ऑलिम्पिया कॉफी हाऊस'चा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. मीरा रोडमधील काशिमीरा परिसरामध्ये, अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीमध्ये सुटा खवा, गोड मावा होता. हे दोन्हीही पदार्थ विनालेबल स्वरूपात तसेच इतर पॅकबंद अन्नपदार्थ अस्वच्छ वातावरणात आणि योग्य तापमान नियंत्रण न ठेवता साठवणूक व वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे, असुरक्षित व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून कलम २३, २६ व २७ नुसार उल्लंघनाप्रकरणी जप्त करण्यात आले.
मुंबई: राज्यातील आरोग्यसेवा आणखीन सुधारण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम पद्धतीची सेवा लाभण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेत राज्याची मोठी झेप ...
दोन गाड्या जप्त करत, लाखो रूपयांचा माल एफडीएने जप्त केला आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुग्धजन्य मिठाई, खवा आणि रबडी जप्त केली आहे. विनालेबल, अस्वच्छ वातावरणात तयार केल्याचे, निकृष्ट दर्जाची असल्याच्या संशयावरून, परवान्यात आवश्यक बदल न करता उत्पादन करणे आणि लेबलवरील त्रुटींप्रकरणी हे सामान जप्त करण्यात आले आहे. नागपूर विभागामार्फत प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या (गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू इत्यादी) अवैध विक्री, साठवणूक व वाहतुकीविरूद्ध दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी ३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान ₹४,१०,७८२/-किंमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ₹८,००,०००/- किंमतीची २ वाहने, असा एकूण ₹ १२,१०,७८२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वादळी फलंदाजी करत ...
याप्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अन्वये संबंधित पोलीस ठाण्यात ३ प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करण्यात आले असून ३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. ग्राहक तक्रारीवरून कुलाबा येथील 'ऑलिम्पिया कॉफी हाऊस'चा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. अस्वच्छता, चुकीच्या पद्धतीने जेवण बनवणे, अस्वच्छ पाण्याचा वापर आणि किचनमध्ये झुरळे व माशांचा प्रादुर्भाव यांसह अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे परवाना निलंबित केला आहे. नायर हॉस्पिटलच्या कॅन्टीनचाही अस्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना तत्काळ निलंबित केला आहे. चेंबुर, घाटकोपर, वरळी इथल्या काही बेकरी आणि हॉटेलचेही परवाने निलंबित केले आहे.