नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेचा यशस्वी समारोप झाला असून सर्वांच्या सहमतीने 'नवी दिल्ली जाहीरनामा' मंजूर करण्यात आला आहे. हा जाहीरनामा म्हणजे भारताची जागतिक पातळीवरील पत आणि मुत्सद्देगिरी सिद्ध करणारा एक मोठा पुरावा आहे, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी व्यक्त केला.
'सेमिकॉन इंडिया २०२६' च्या मंचावरून पंतप्रधानांचे वक्तव्य
#WATCH | Delhi | SEMICON India 2026 | Prime Minister Narendra Modi says, "India successfully concluded the BRICS Summit. The adoption of the New Delhi Declaration with everyone's support is one more piece of evidence of India's global credibility. And SEMICON India being held… pic.twitter.com/TArKI3gu8A
— ANI (@ANI) September 17, 2026
नवी दिल्लीतील 'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर' येथे आयोजित 'सेमिकॉन इंडिया २०२६' (SEMICON India 2026) या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान बोलत होते. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, "भारताने ब्रिक्स परिषदेचे अत्यंत यशस्वी आयोजन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध मतभेद असतानाही सर्वच देशांच्या पाठिंब्याने 'नवी दिल्ली जाहीरनामा' एकमुखाने मंजूर होणे, हे भारताच्या वाढत्या प्रभावाचे आणि विश्वासाचे स्पष्ट प्रतीक आहे."
उधमपूर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवादाविरोधात कारवाई सुरूच आहे. उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम आणि घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी ...
पश्चिम आशियातील तणावातही भारताची मध्यस्थी यशस्वी
भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी मोठी झेप
ब्रिक्स परिषदेच्या या मोठ्या यशानंतर लागलीच 'सेमिकॉन'सारख्या जागतिक दर्जाच्या परिषदेचे आयोजन होणे हा भारतासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे मोदींनी नमूद केले. ही तीन दिवसीय परिषद भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक, नवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधींना मोठी गती देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
जगभरातून ५० हून अधिक देशांची हजेरी
या भव्य प्रदर्शनात जगभरातून ६०० हून अधिक प्रदर्शक, ३०० आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि ५० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडन या तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशांची विशेष दालने (कंट्री पॅव्हेलियन) उभारण्यात आली आहेत. याशिवाय, भारतातील १२ राज्य सरकारे आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या 'स्टार्टअप्स'साठीही या प्रदर्शनात स्वतंत्र जागा देण्यात आली आहे.