Chhatrapati Sambhajinagar News : गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्या, अन् भयानक घडलं; १३ मुलांना...

Chhatrapati Sambhajinagar News : गणेशोत्सवाच्या उत्साहात गणपतीची आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने 13 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव येथे ही घटना घडली. मुलांना उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात (Vaijapur Sub-District Hospital) दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.



गणपती बसवला, आरती केली अन् प्रसादासाठी...


मिळालेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने गावातील काही मुलांनी एकत्र येत मातीची गणपतीची मूर्ती बसवली होती. त्यानंतर सर्वांनी गणपतीची आरती केली. आरती झाल्यानंतर प्रसादासाठी त्यांच्याकडे कोणताही खाद्यपदार्थ उपलब्ध नव्हता. त्यामुळे परिसरात उपलब्ध असलेल्या एरंडाच्या बिया मुलांनी प्रसाद म्हणून खाल्ल्या. मात्र, काही वेळातच त्यांना त्रास जाणवू लागला.



एकाच वेळी अनेक मुलांना उलट्या


एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या. काही मुलांना अस्वस्थताही जाणवू लागल्याने कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्व मुलांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात (Vaijapur Sub-District Hospital) दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मुलांवर उपचार सुरू केले. एकाच वेळी 13 मुलांना त्रास झाल्याने वैद्यकीय यंत्रणेकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.



अनोळखी बिया किंवा वनस्पती खाणे टाळण्याचे आवाहन


या घटनेमुळे लहान मुलांनी परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही अनोळखी बिया, फळे किंवा वनस्पतींचे भाग खाद्य आहेत की नाहीत याची माहिती नसताना खाणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे आणि अनोळखी बिया किंवा वनस्पतींचे भाग खाण्यापासून त्यांना रोखणे गरजेचे आहे. सध्या सर्व 13 मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic News: पुणेकरांनो, गणपती दर्शनासाठी जाताय? ‘या’ ६ रस्त्यांवर पार्किंगला बंदी!

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुणेकरांना वाहतूकीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये

Yavatmal Crime News : घरासमोरची कार ठरली चिमुकल्यासाठी काळ, चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू ; नेमकं घडलं काय ?

Yavatmal Crime News : घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची

Pune Hadapsar Railway : पुणे रेल्वे प्रवासाचे गणित बदलणार! १५ दिवस मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द तर २५ गाड्यांचे मार्ग बदलणार

हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पुणे : हडपसर ते घोरपडीदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या

SSC HSC Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा

SSC HSC Board Exam 2027 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन जाणार? शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार, सरकारने नियम केले स्पष्ट

ग्रामीण भागात बाजारमूल्याच्या 4 पट, तर शहरी भागात 2 पट भरपाईची तरतूद; मात्र सरसकट चौपट मोबदला नाही कोल्हापूर :

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची जोरदार एन्ट्री, 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह