छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील काही भागांत अखेर पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (१७ सप्टेंबर) झालेल्या पावसामुळे काही भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत.(Marathwada Lightning Strike)
मराठवाड्यातील ३१ महसूल मंडळांत जोरदार पाऊस
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील ३१ महसूल मंडळांमध्ये गुरुवारी एका दिवसात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातील झरी महसूल मंडळात सर्वाधिक १२६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे ११२.५ मिलिमीटर, तर परभणीतील पेडगाव येथे १११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सरासरी ५.४ ते ४१.८ मिलिमीटर पाऊस पडला.(Marathwada Lightning Strike)
वीज पडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाघुळखेडा येथे पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या तीन जणांवर वीज कोसळली. या दुर्घटनेत हमिदा सय्यद, तस्लीम सय्यद आणि अलमिरा सय्यद यांचा मृत्यू झाला. अन्य तीन जण जखमी झाले. दुसरी घटना सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे घडली. पावसापासून बचाव करण्यासाठी झोपडीमध्ये आसरा घेतलेल्या मनोहर दुधे आणि त्यांच्या पत्नी पार्वताबाई यांच्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा पंढरीनाथ जखमी झाला.(Chhatrapati Sambhajinagar)
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शुक्रवारी, १८ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय क्रिकेटच्या प्रशासनाशी संबंधित ...
पावसाची तूट कायम
मराठवाड्यातील पावसाची परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे. पावसाळ्यात या विभागात सरासरी ६७९.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र, आतापर्यंत ४२३.३ मिलिमीटर म्हणजेच अपेक्षित पावसाच्या ६२.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची तूट ३७.३ टक्के आहे. दीर्घ खंडानंतर झालेल्या पावसामुळे काही भागांतील खरीप पिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी शेती आणि पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही.(Chhatrapati Sambhajinagar)