- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा बुधवारी निकाल लागणार आहे. या बहुचर्चित प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणात उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे प्रतिवादी असल्याने संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.
दिशाचे वडील सतिश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आपली मुलगी दिशा हिने आत्महत्या केलेली नसून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला नसून राजकीय दबावापोटी पुरावे लपवल्याचा दावाही त्यांनी याचिकेत केला आहे. याउलट, राज्य सरकारने आपली बाजू मांडताना मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच वर्षांत मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याची ...
दुसरीकडे, या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद करताना, आपल्याला राजकीय वैमनस्यातून आणि सुडाच्या राजकारणातून या प्रकरणात गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांच्या दुःखाबद्दल आणि दिशाच्या वडिलांबद्दल पूर्ण संवेदना असल्याचे सांगत, या दुर्दैवी मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण आता थांबायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने मृतदेहाच्या पंचनाम्यावरून आणि वैद्यकीय अहवालावरून काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले होते, ज्यावर सरकारी वकिलांनी बाजू मांडली आहे. या प्रकरणातील अंतिम निकाल काय लागणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.





