प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थीनीचा मृत्यू

नांदगाव प्रतिनिधी : तालुक्यात सर्वत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात असतानाच जातेगाव येथील ९वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने दुःखद निधन झाले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (वय १५) प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडली असता तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले असता नांदगाव येथे जात असताना रस्त्यातच तिचे निधन झाले. तिच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान दुपारी तिच्या मृतदेहावर गावात शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली