बिहार दुर्घटनेतील एस. पी. सिंगला कंपनीचं मुंबईतील कंत्राट रद्द करा

मुंबई : बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवर बांधकाम सुरु असलेला पूल रविवारी पडला. या पुलाच्या बांधकामाचे कत्राट एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आले होते. त्यामुळे अशा कंपनीला मुंबईतल्या पुलाच्या बांधकामाचं कंत्राट देऊ नये व कंपनीचा काळ्या यादीत समावेश करावा, अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गाच्या पुलाचं काम एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आलं होतं. मात्र हे काम काढून आता दुसर्‍या कंपनीला देण्यात यावं, अशी रवी राजांची मागणी आहे.


डिसेंबर २०२१ला या कंत्राटाबाबतचा प्रस्ताव पास झाला आणि जानेवारी २०२२ मध्ये तो मंजूर झाला. मुंबईतल्या पुलांचे कामही एस. पी. सिंगला कंपनीकडून सुरु करण्यात आले आहे. याबाबत गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे जे काम सध्या सुरु आहे ते निकृष्ट दर्जाचे आहे, असे रवी राजा म्हणाले. दीड वर्षांत त्यांनी फक्त २०% काम पूर्ण केले आहे. या कंपनीने बांधलेला पूल ४ जूनला कशा प्रकारे कोसळला ते अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे, त्यामुळे कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची रवी राजांनी मागणी केली आहे. यासंबंधी महापालिका आयुक्तांनी फेरविचार करावा व ताबडतोब निर्णय घ्यावा, असे आवाहन रवी राजांनी केले.



कमिशनखोर उद्धव सरकार


दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतल्या पुलांचं कंत्राट एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आलं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सरकारने फक्त आणि फक्त वसुली आणि कमिशनच्या उद्देशापोटी कामे दिली, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. हे कंत्राट दुसर्‍या सक्षम कंपनीला देण्याची मी मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Dadaji Bhuse : शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियान; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये काढणार चार दिवसांचा दौरा मुंबई : राज्यातील शाळांमधील मूलभूत

Shiv Sena party constitution : २०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले; सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद

४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती निवडणूक आयोगाच्या

jaykumar gore : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक; मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका

मुंबई : ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज बैठक घेऊन संबंधित मागण्यांचा

Mangal Prabhat Lodha : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना

• कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांशी संवाद मुंबई :

Mangal Prabhat Lodha : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एक महापालिका शाळा दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे; मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऑस्ट्रेलियातील ‘न्यू साउथ वेल्स’सोबत सामंजस्य करार

-वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि कौशल्य विकासासह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर; ९०