Loksabha Election : भाजपा देशात ३७७ आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये अंदाज

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला आहे. तर इकडे महाराष्ट्रातही महायुतीने ४५+ जागा जिंकण्याचा विडा उचलला आहे. यासाठी शिंदे-फडणवीस-पवारांनी अनेक डावपेच आखले आहेत. अनेक जागांवर दिग्गजांना धक्कातंत्र अवलंबण्याची तयारीही झाली आहे. त्यामुळे महायुती हे टार्गेट गाठू शकते, महायुतीचा ४५ जागांवर विजय होऊ शकतो, असा झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये अंदाज बांधण्यात आला आहे.


झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात ३७७ आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला देशात ९३ आणि महाराष्ट्रात केवळ तीन जागा जिंकता येऊ शकतात, असाही अंदाज बांधण्यात आला आहे.


देशात भाजपाने ३७० आणि एनडीएने ४००+ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर महाराष्ट्रात एकूण ४५ जागांचे लक्ष्य ठेवले आहे. हेच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या २३ जागांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. आपल्या हक्काच्या २३ जागा पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपाने निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे या निवडणूक निरीक्षकामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांच्या चर्चा सुरु आहेत. यामध्ये विशेषत: गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे अग्रस्थानी असून राज्यातील २३ लोकसभा जागांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


राज्यात सध्या महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. शिंदे यांनी १७ ते १८ जागांवर दावा केला आहे. तर शिंदेंएवढ्याच जागा आपल्याला मिळाव्या असा आग्रह अजित पवार यांनी धरला आहे. त्यामुळे या सगळ्यावर नेमका कसा तोडगा निघतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र एनडीएने भारतात ४०० आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली