Economic Survey : प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांवरील सरकारी भांडवली खर्चात ३८.८ टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ सादर केला. यात म्हटलेय की, २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत केंद्र सरकारच्या पायाभूत क्षेत्रावरील भांडवली खर्चात ३८.८ टक्के दराने वाढ झाली. २०२४-२५ मध्ये जुलै ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान भांडवली खर्चाने वेग घेतला. ऊर्जाक्षेत्राचा विस्तार वाढला असून नोव्हेंबर २०२४ पर्यंत स्थापित क्षमता वार्षिक ७.२ टक्क्यांनी वाढून ४५६.७ गिगावॅटवर पोहोचली. देशाची एकूण अक्षय ऊर्जा स्थापित क्षमता डिसेंबर २०२४ अखेरीस १५.८ टक्क्यांनी वाढून २०९.४ गिगावॅट झाली, जी डिसेंबर २०२३ मध्ये १८०.८ गिगावॅट होती.


सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या अंमलबजावणीमुळे शहरी भागात दैनंदिन सरासरी वीजपुरवठ्यात आर्थिक वर्ष २०१४ मधील २२.१ तासांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २३.४ तासांपर्यंत सुधारणा झाली. ग्रामीण भागात हा वेळ १२.५ तासांवरून २१.९ तासांपर्यंत वाढला. ऊर्जेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आर्थिक वर्ष २०१४ मधील ४.२ टक्क्यांवरून डिसेंबर २०२४ मध्ये केवळ ०.१ टक्क्यांवर आली.



ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ऑगस्ट २०१९ मध्ये जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा केवळ ३.२३ कोटी (१७ टक्के) ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध होता. नोव्हेंबर २०२४ पर्यंत १२.०६ कोटी नवीन कुटुंबे या योजनेत समाविष्ट झाली असून १५.३० कोटी (७९.१ टक्के) कुटुंबांना नळाद्वारे पाणी उपलब्ध झाले.


स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यात हागणदारीमुक्त (ओडीएफ) दर्जा प्राप्त झाला. २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात हागणदारीमुक्त प्लस (ओडीएफ प्लस) गावांवर भर दिला जात आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत १.९२ लाख गावे हागणदारीमुक्त प्लस घोषित करण्यात आली असून ओडीएफ प्लस गावांची संख्या ३.६४ लाख झाली.


शहरी भागात ९७ टक्के कुटुंबांना शौचालये उपलब्ध असून डिसेंबर २०२४ पर्यंत ६३.७ लाख वैयक्तिक घरगुती शौचालये, ६.४ लाख सामुदायिक व सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली.


प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत १.१८ कोटी घरे मंजूर झाली असून ८९ लाखांहून अधिक घरे पूर्ण झाली. पीएमएवाय-यू २.० सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू झाली असून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६ लाख नवीन घरांसाठी मंजुरी मिळाली.


भारताच्या २९ शहरांमध्ये मेट्रो व जलद रेल्वे वाहतूक व्यवस्था सुरू आहे किंवा उभारणीच्या टप्प्यात आहे. यातील २३ शहरांमध्ये १०१० किलोमीटर वाहतूक व्यवस्था कार्यरत असून ९८० किलोमीटरसाठी काम सुरू आहे. २०२५ मध्ये ५ जानेवारीपर्यंत ६२.७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आणि दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या १०.२ दशलक्ष झाली.


अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियान (अमृत) अंतर्गत ५०० शहरांमध्ये जल व्यवस्थापन सुधारण्यात आले असून नळाद्वारे पाणीपुरवठा ७० टक्क्यांवर पोहोचला. दररोज ४६४९ दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण क्षमता निर्माण किंवा वाढवण्यात आली असून २४३९ उद्याने विकसित करण्यात आली, ज्यामुळे ५०७० एकर हिरवळीची जागा वाढली. २०२१-२२ ते २०२५-२६ दरम्यान २.७७ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह अमृत २.० सुरू करण्यात आले. आतापर्यंत १.८९ लाख कोटी रुपयांचे ८९२३ प्रकल्प सुरू झाले.


स्मार्ट सिटी अभियानांतर्गत १३ जानेवारी २०२५ पर्यंत १.६४ लाख कोटी रुपयांचे ८०५८ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून त्यापैकी १.५० लाख कोटी रुपयांचे ७४७९ प्रकल्प पूर्ण झाले.


रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा २०१६ (रेरा) नागालँड वगळता सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत लागू झाला आहे. ६ जानेवारी २०२५ पर्यंत १.३८ लाख बांधकाम प्रकल्प आणि ९५,९८७ रिअल इस्टेट एजंट नोंदणीकृत झाले. देशभरात १.३८ लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला.


डिसेंबर २०२४ पर्यंत तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम (PRASHAD) अंतर्गत ४८ प्रकल्पांना मंजुरी मिळाली, त्यापैकी २६ प्रकल्प पूर्ण झाले. स्वदेश दर्शन योजनेत ७६ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून ७५ पूर्ण झाले.


भारत सध्या ५६ सक्रिय अंतराळ मालमत्ता चालवतो, ज्यामध्ये १९ संप्रेषण उपग्रह, ९ नेव्हिगेशन उपग्रह, ४ वैज्ञानिक उपग्रह आणि २४ पृथ्वी निरीक्षण उपग्रहांचा समावेश आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने ७२ एक वेब उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.


देशभरातील पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीस चालना देणे आवश्यक असून प्रकल्पांच्या संकल्पना, अंमलबजावणी आणि व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण धोरणे विकसित करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात नोंदवला आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी