प्रयागराज महाकुंभमेळ्यात धावल्या विक्रमी १७ हजार गाड्या

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक


प्रयागराज (वृत्तसंस्था): रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सकाळी प्रयागराजला भेट दिली आणि महाकुंभमेळ्यासाठी भारतीय रेल्वेच्या व्यापक तयारीचा स्वतः आढावा घेतला. या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे महत्व ओळखून, त्यांनी उत्तर मध्य रेल्वे , ईशान्य रेल्वे आणि उत्तर रेल्वे अंतर्गत विविध स्थानकांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन केले. या वेळी त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला .


रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी विविध विभागांमधील अखंड समन्वयाचे कौतुक केले आणि सर्व यात्रेकरूंसाठी सुरक्षित, कार्यक्षम आणि आरामदायी प्रवास सुलभ दिल्याबद्दल भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. संपूर्ण कार्यक्रमात माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या सतत मार्गदर्शनाबद्दल रेल्वेमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आणि यात्रेकरूंच्या अभूतपूर्व संख्येने मदत केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि शेजारील राज्यांच्या सरकारांचेही आभार मानले. रेल्वे कर्मयोगींच्या उत्कृष्ट समर्पणाचे रेल्वेमंत्र्यांनी कौतुक केले. त्यांच्या भेटीदरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी अशा कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यात भूमिका बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांमधील प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिकरित्या भेट घेतली आणि त्यांचे कौतुक केले.


प्रवाशांना मदत करणाऱ्या आघाडीच्या कर्मचाऱ्यांपासून सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या आरपीएफ, जीआरपी आणि पोलिस कर्मचाऱ्यांपर्यंत, रेल्वेचे सुरळीत कामकाज करणाऱ्या अभियंत्यांपासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत, वैद्यकीय मदत देणाऱ्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांपासून ते हेल्प डेस्क अधिकाऱ्यांपर्यंत आणि प्रवासाची सोय करणाऱ्या बुकिंग कर्मचाऱ्यांपर्यंत - सर्वांच्या योगदानाचे कौतुक केले.


यावेळी त्यांनी टीटीई, चालक , सह चालक , सिग्नल आणि टेलिकॉम कर्मचारी, टीआरडी आणि इलेक्ट्रिकल टीम, एएसएम, कंट्रोल ऑफिसर्स, ट्रॅकमन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचेही आभार मानले.


भारतीय रेल्वेने महाकुंभ साठीच्या नियोजित केलेल्यापेक्षा जास्त रेल्वेसेवा प्रदान केल्या. या काळात एकूण १७ हजार १५२ गाड्या चालवण्यात आल्या, जे नियोजित १३,००० गाड्यांपेक्षा जास्त होत्या. यात गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत चार पटवाढ झाली. यामध्ये ७ हजार ६६७ विशेष गाड्या आणि ९ हजार ४८५ नियमित गाड्यांचा समावेश होता, ज्यामुळे भाविकांना सुरळीत आणि कार्यक्षम प्रवास करता आला. एकूण ६६ कोटी यात्रेकरू महाकुंभात सहभागी झाले होते.


मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रयागराजमधील नऊ प्रमुख स्थानकांवर व्यापक पायाभूत सुविधा उभारल्या, ज्यामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसरा प्रवेशद्वार, ४८ फलाट आणि २१ पादचारी पूल बांधण्यात आले. गर्दी नियंत्रित करण्यासाठी फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजीआणि ड्रोन पाळत ठेवण्यासह १ हजार १८६ सीसीटीव्ही कॅमेरे वापरून देखरेख मजबूत करण्यात आली.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी