Pahalgam Terror Attack: आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार, सलग सहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू आणि काश्मीर: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने चहू बाजूने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे, आणि या भीतीमुळेच पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यास (Pakistan Ceasefire Violation) सुरुवात केली आहे. नियंत्रण रेषेनंतर () पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) देखील गोळीबार केला असल्याचे वृत्त आहे.


२९-३० एप्रिलच्या रात्री, ने जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. कोणत्याही चिथावणीशिवाय पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांकडून छोट्या शस्त्रांनी हा गोळीबार करण्यात आला असल्याची बातमी आहे. अशाप्रकारे पाकिस्तानी सैन्याद्वारे सलग सहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.



गेल्या सहा दिवसांपासून सीमेवर गोळीबार, भारतीय सैन्यांकडून चोख उत्तर


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला युद्धाची धडकी भरली आहे. त्याच्या नैराश्यात त्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरही युद्धबंदीचे उल्लंघन सुरू केले आहे. याआधी, पाकिस्तान पाच दिवसांपासून एलओसीवर युद्धबंदीचे उल्लंघन करत होता. पण बुधवारी पाकिस्तानने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. त्यांनी जम्मूच्या परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला आहे. संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे की, मंगळवारी सकाळपर्यंत पाकिस्तानी सैन्य फक्त नियंत्रण रेषेवरच युद्धबंदीचे उल्लंघन करत होते, परंतु आता बुधवारी रात्री जम्मूच्या परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला आहे, याशिवाय, बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांमधील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून आणि परगवाल सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडेही लहान शस्त्रांचा अकारण गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्याच्या जवानांनी लगेचच ताबा घेतला आणि प्रत्युत्तर दिले.


यादरम्यान भारतीय लष्कराने आतापर्यंत तोफखाना, तोफा आणि हवाई संरक्षण तोफा वापरल्या नाही. कारण पाकिस्तानकडून फक्त लहान शस्त्रांनी गोळीबार केला जात आहे.



सीमावर्ती भागात ऑपरेशनल अलर्ट जारी


पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर, नियंत्रण रेषेच्या अनेक भागांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. भारतीय लष्कर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आणि सीमावर्ती भागात ऑपरेशनल अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकार ऍक्शन मोडमध्ये आहे आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेत आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी