Stampede at Goa Temple: लैराई देवीच्या जत्रोत्सवाला गालबोट! चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक भाविक जखमी

गोवा: गोव्यातील शिरगाव येथे आयोजित श्री लैराई जत्रेदरम्यान लाराई मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede at Goa Temple) ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अचानक गर्दीत घबराट पसरल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे, यामुळे लोकं जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले, ज्यामुळे परिस्थिती अत्यंत भयावह बनली.


घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले, तसेच मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले. चेंगराचेंगरीमागील कारण अद्याप माहित झाले नसले तरी, प्राथमिक अहवालानुसार गर्दी आणि योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येते.



लैराई जत्रेमध्ये हजारो भाविक आले होते


शुक्रवारी सुरू झालेल्या श्रीदेवी लैराई जत्रेमध्ये हजारो भाविक आले होते. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुमारे १,००० पोलिस अधिकारी आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता.



लैराई जत्रेची जुनी परंपरा


गोव्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशात लैराई देवीचे विशेष स्थान आहे. शिरगाव येथील श्री देवी लैराई देवस्थानात हजारो भाविक शांती, समृद्धी आणि आनंदासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येतात. हिरवळीने वेढलेले हे मंदिर प्रार्थना आणि चिंतनासाठी एक शांत वातावरण प्रदान करते. हे मंदिर उत्तर आणि दक्षिणेकडील स्थापत्य शैलींच्या मिश्रणासाठी ओळखले जाते, दर मे महिन्यात येथे जत्रा भरते.


देवी पार्वतीचा अवतार मानल्या जाणाऱ्या लैराई देवींच्या दर्शनासाठी गोवा आणि परदेशातील भाविक एकत्र येतात . परंपरेत खोलवर रुजलेला हा उत्सव अद्वितीय विधी आणि एक नेत्रदीपक सोहळा प्रदर्शित करतो. गोवा पर्यटन वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे, मौलिंगेमसह जवळपासच्या भागातील ग्रामस्थ दिवसभर देवी लैराईला समर्पित धार्मिक विधी आणि अर्पणांमध्ये सहभागी होतात. लैराई जत्रेदरम्यान मध्यरात्रीच भाविक मंदिरात जमतात. भाविक मंदिराच्या आत ढोल-ताशांच्या तालात काठ्या वाजवत नृत्य सादर करतात. नृत्य सत्रांच्या शेवटी,एक व्यक्ती मंदिराजवळ एक भव्य शेकोटी पेटवतो, पहाटेच्या वेळी, ही शेकोटी विझल्यानंतर, त्याच्या गरम निखाऱ्यावरून अनवाणी चालण्याचा विधी सुरू होतो.



आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व


भक्त देवी लैराईचे नाव घेत निखाऱ्यांमधून धावतात, काही जण हे अनेक वेळा करतात. त्यानंतर, ते त्यांची माळ वडाच्या झाडावर टाकून घरी जातात, कारण सूर्योदयाने उत्सव संपतो.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी