‘ऑपरेशन धप्पा’: दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काँग्रेसचा माजी आमदार सापडला!

ईडीच्या छाप्यात ५०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश!


गंगेत डुबकी घेत असताना मुलगाही अटकेत


नवी दिल्ली : दिल्लीतील कनॉट प्लेस भागात स्थित अशोका रोडवरील पाचतारांकित शांगरी-ला हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ होती. पण कोणालाही कल्पना नव्हती की, याच हॉटेलमध्ये प्रवर्तन संचालनालय (ED) एक धडकी भरवणारी कारवाई करणार आहे. ही कारवाई होती ‘ऑपरेशन धप्पा’, ज्यात ५०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी हरियाणाचे माजी आमदार धर्म सिंह छोकर यांना अटक करण्यात आली.



कोण आहेत धर्म सिंह छोकर?


धर्म सिंह छोकर हे हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील समालखा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलगा सिकंदर सिंहवर आरोप आहे की, त्यांनी ‘दीन दयाळ आवास योजना’च्या नावाखाली १५०० लोकांना घरं देण्याचं आमिष दाखवून सुमारे ५०० कोटी रुपये उकळले.


या प्रकरणात साई आइना फार्म्स प्रा. लि. आणि महिंद्रा होम्स या दोन कंपन्यांचा सहभाग आहे, ज्या छोकर वडील-मुलाच्या ताब्यातील होत्या.



ऑपरेशन ‘धप्पा’ कसं राबवलं गेलं?


ईडीने धर्म सिंह आणि त्यांच्या मुलाला अनेकदा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून गैरजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. परंतू धर्म सिंह हे सापडत नव्हते.


शेवटी ईडीच्या गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्म सिंह हे दिल्लीच्या शांगरी-ला हॉटेलमध्ये थांबलेले असल्याचं समजलं. तेव्हा विशेष पथक तयार करण्यात आलं आणि एक गुप्त छापामारीची मोहीम राबवण्यात आली, ऑपरेशन धप्पा!


ईडीने हॉटेलमध्ये दबक्या पावलांनी प्रवेश करत धर्म सिंह यांना गुप्तपणे अटक केली.



हरिद्वारमध्ये गंगेत डुबकी घेणारा मुलगाही अटकेत


धर्म सिंह यांचा मुलगा सिकंदर हा त्या वेळी हरिद्वारमध्ये धार्मिक विधीसाठी गंगेत डुबकी घेण्याच्या तयारीत होता. पण ईडीचं जाळं त्याच्यावरही होतं आणि त्यालाही तिथेच अटक करण्यात आली.



१५०० लोकांची फसवणूक… आणि कोण कोण दोषी?


दीन दयाळ आवास योजना अंतर्गत लोकांना परवडणारी घरे देण्याचं वचन देण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात लाखो रुपये उकळून कोणालाही घरं मिळाली नाहीत.


ईडी सध्या याप्रकरणी कसून चौकशी करत असून अजूनही काही राजकीय व्यक्ती, बिल्डर आणि आर्थिक गुन्हेगारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.



पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत


लोकांचे ५०० कोटी गेले कुठे?


या फसवणुकीच्या जाळ्यात अजून किती बडी माणसं सामील आहेत?


आणि पीडितांना न्याय कधी मिळणार?


Comments
Add Comment

Lucknow Crime News : तरुणीला कारची धडक, बोनेटवर लटकवत नेलं अन्..., व्हिडीओ व्हायरल

Lucknow Crime News : देशभरात हिट अँड रनच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून

India Russia relations : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ रशियाच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होणार

नवी दिल्ली: भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य अधिक बळकट करण्याच्या

India's First Dengue Vaccine : डेंग्यूचा धोका होणार कमी? भारताची स्वदेशी ‘DengiAll’ लस २०२७ मध्ये येण्याची शक्यता

मुंबई : पावसाळा सुरू झाला की भारतात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि प्लेटलेट्स

India Pakistan : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र निषेध

नवी दिल्ली : उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारतीय नौदल आणि पाकिस्तान नौदलाच्या जहाजांमध्ये

Bihar Flood News : बिहारमध्ये 50 लाख लोक पुराच्या विळख्यात, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

Bihar Flood News : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारमधील १५

UPI Rules : UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार का? जाणून घ्या सरकारचे नियम

मुंबई : भारतात डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या माध्यमांपैकी एक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स