‘बॉयकॉट तुर्की’ आंदोलन तीव्र; ट्रॅव्हल कंपन्यांपासून बाजारपेठांपर्यंत तुर्कीला भारतीयांचा दणका!

पुण्यापाठोपाठ उदयपूरही मैदानात!


दिल्ली/पुणे/उदयपूर : पाकिस्तानला शस्त्रास्त्रे आणि ड्रोन पुरवणा-या तुर्कीविरोधात भारतभर संतापाची लाट उसळली आहे. ‘बॉयकॉट तुर्की’ हे अभियान आता केवळ सामाजिक माध्यमांपुरते राहिले नसून प्रत्यक्ष व्यापार क्षेत्रातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पुण्यानंतर आता उदयपूरच्या मार्बल व्यापा-यांनीही तुर्कीशी व्यापार तोडण्याचा निर्णय घेतला आहे.



तुर्कीचा विश्वासघात


भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला मदतीचा हात देत, लष्करी विमाने भरून ड्रोन आणि शस्त्रास्त्रे पाठवली होती. याउलट जेव्हा तुर्कीत महाभयंकर भूकंप झाला होता, तेव्हा भारताने सर्वात मोठा मदतीचा हात पुढे केला होता. मात्र तुर्कीने भारताचे उपकार विसरून पाकिस्तानला पाठिंबा देत भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना आता जनतेत प्रबळ झाली आहे.



पुण्यातून सुरू झालेला बहिष्कार


पुण्याच्या व्यापा-यांनी तुर्कीमधून आयात होणारे सफरचंद आणणे थांबवले आहे. त्यामुळे बाजारात या सफरचंदांचा तुटवडा जाणवतो आहे. आधी ग्राहकांना याची माहिती नव्हती की काही सफरचंद तुर्कीतून येतात, मात्र आता ती जाणीव वाढली आहे. पुण्यात दरवर्षी १००० ते १२०० कोटींची सफरचंदांची उलाढाल होते. सध्या या व्यापारात मोठी घट झाली असून, व्यापा-यांनी तुर्कीऐवजी इराण, हिमाचल आणि उत्तराखंडमधून माल मागवण्यास सुरुवात केली आहे.



उदयपूरच्या मार्बल व्यापा-यांचा ठाम निर्णय


उदयपूरचे मार्बल व्यापारीही आता या मोहिमेत सामील झाले आहेत. “जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत आहे, तोपर्यंत आमचा कोणताही व्यापार तुर्कीशी होणार नाही,” असे दयापूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराणा यांनी जाहीर केलं आहे. भारतात आयात होणा-या संगमरवरीपैकी जवळपास ७० टक्के मार्बल तुर्कीमधून येतो. त्यामुळे उदयपूरच्या या निर्णयाचे जागतिक बाजारात मोठे पडसाद उमटू शकतात.


सुराणा पुढे म्हणाले की, “देशभरातील सर्व मार्बल उद्योगांनी जर तुर्कीविरोधात एकत्र निर्णय घेतला, तर तो जगाला भारताच्या ठाम भूमिकेचा संदेश देईल.”


तुर्कीच्या पाकिस्तानप्रेमामुळे भारतातील जनता आणि व्यापारी आता संयम गमावत असून, व्यवसायाच्या माध्यमातून तुर्कीला आर्थिक फटका देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


बॉयकॉट तुर्की
‘बॉयकॉट तुर्की’चा परिणाम वाढतोय – ट्रॅव्हल कंपन्यांपासून बाजारपेठांपर्यंत तुर्कीला भारतीयांचा दणका

तुर्कीने पाकिस्तानला समर्थन देत भारतविरोधी भूमिका घेतल्यानंतर देशभरात ‘बॉयकॉट तुर्की’चा सूर चढताना दिसतो आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत करणाऱ्या तुर्कीच्या भूमिकेमुळे भारतात संताप उसळला आहे. आता या रोषाचं प्रतिबिंब केवळ सोशल मीडियापुरतं नाही, तर प्रत्यक्ष व्यवहार आणि व्यापारावरही दिसू लागलं आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर ‘#BoycottTurkey’ हा हॅशटॅग प्रचंड लोकप्रिय झाला आहे.



ट्रॅव्हल कंपन्यांचा तुर्कीवर बहिष्कार


Ixigo, EaseMyTrip यांसारख्या अनेक मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्कीसाठीच्या फ्लाइट्स आणि हॉटेल बुकिंगवर थेट बंदी घातली आहे. EaseMyTrip ने अधिकृतपणे जाहीर केलं की, “भारतविरोधी भूमिकेमुळे तुर्कीच्या पर्यटनाला पाठबळ देणार नाही.” या निर्णयाचे व्यापारी जगतातही स्वागत झाले आहे.



आता मागणी ईराण, वॉशिंग्टन, न्यूझीलंडच्या सफरचंदांची


तुर्कीच्या सफरचंदांऐवजी आता भारतीय व्यापारी ईराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधील सफरचंदांना प्राधान्य देत आहेत. यामुळे ईराणच्या सफरचंदांचा १० किलोचा भाव २०० रुपये वाढून ३०० रुपयांवर गेला आहे. किरकोळ बाजारातही दर किलो भाव २०–३० रुपयांनी वाढले आहेत.



काश्मीरमधून होणाऱ्या पुरवठ्यावरही परिणाम


भारतातील घरगुती सफरचंद पुरवठा प्रामुख्याने काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड मधून होतो. पण, यंदा पहलगाममधील तणावपूर्ण परिस्थिती आणि पावसामुळे वाहतूक अडचणीत आली, याचा परिणाम काश्मिरी सफरचंदांच्या उपलब्धतेवर झाला आहे. काश्मिरी सफरचंद साठवण्याची खास पद्धत असली तरी यावर्षी पुरवठा कमी भासत आहे.



तुर्कीमधून भारतात काय आयात होतं?


तुर्कीमधून भारतात दरवर्षी खनिज तेल, यंत्रसामग्री, बॉयलर्स, संगमरवरी, जिप्सम, अकार्बनिक रसायनं, मौल्यवान धातू व दगड, तसेच सफरचंद, चेरी, हेजलनट्स यांसारखे फळं आणि मेवे मोठ्या प्रमाणावर येतात. फक्त सफरचंदच नव्हे, तर तुर्कीच्या फळांवरही आता बहिष्कार लादला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यापारी वर्तुळात बोलली जात आहे.


‘बॉयकॉट तुर्की’ आता फक्त सोशल मीडियाचा ट्रेंड राहिलेला नाही, तर ती एक व्यापारी चळवळ बनत चालली आहे. भारताने उपकार केलेल्या देशाने भारताच्या विरोधात उभं राहिल्यानं, आता भारतीय जनतेनेच आर्थिक ताकदीने प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी