Chenab Bridge : १३०० मीटर लांब, ४६७ मीटर ऊंच...पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी ( ६ जून) जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला रेल्वेने जोडण्याकरिता बांधण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, चिनाब पुलाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच श्रीनगर ते जम्मूमधील कटरा यांना जोडणाऱ्या दोन खास डिझाइन केलेल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, अशी घोषणा केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे.


केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ. सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आणि म्हटले की, "इतिहास घडत आहे... फक्त ३ दिवस बाकी आहेत! जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, शक्तिशाली चिनाब पूल, जम्मू आणि काश्मीरमध्ये उंच उभा आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) चा एक भाग. निसर्गाच्या कठीण परीक्षांना तोंड देण्यासाठी बांधलेला. पंतप्रधान मोदी ६ जून २०२५ रोजी चेनाब पुलाचे उद्घाटन करणार आहेत. नवीन भारताच्या ताकदीचे आणि दृष्टिकोनाचे अभिमानास्पद प्रतीक!"



या रेल्वे लिंकचे उद्घाटन सुरुवातीला १९ एप्रिल २०२५ रोजी होणार होते, परंतु हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीसह प्रतिकूल हवामान यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. ६ जून रोजी होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या अनुरूप हे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, कारण रेल्वे लिंकमुळे यात्रेकरूंचा प्रवास सुलभ होईल.



पुलांवर उच्च तंत्रज्ञानाचे कॅमेरे


दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सुरक्षा व्यवस्था लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. कटरा-संगलदन विभाग आणि संपूर्ण यूएसबीआरएल ट्रॅकवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. विशेषतः कटरा, उधमपूर, रियासी आणि रामबन जिल्ह्यांमध्ये कसून तपासणी, सामानाची तपासणी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहेत. संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकवर, विशेषतः बोगदे आणि पुलांवर उच्च तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या नवीन सुरक्षा ऑडिटनंतर हे उपाय करण्यात आले आहेत.



२ नवीन वंदे भारत एक्सप्रेस 


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी ६ जून रोजी रियासी जिल्ह्यातील चिनाब पुलावर पाहणीसाठी जाण्यापूर्वी उधमपूर येथे उतरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा स्थानकावर पोहोचतील आणि दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील - एक कटरा ते बारामुल्ला आणि दुसरी बारामुल्ला ते कटरा अशी व्हर्च्युअल पद्धतीने. या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी