Vande Bharat : कोल्हापूरकरांनो तुमच्यासाठी खुशखबर! कोल्हापूर-मुंबई दरम्यान १५ दिवसांत वंदे भारत ट्रेन धावणार!

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या १५ दिवसांत ती टर्मिनसवरून धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.



सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी ३ दिवस धावते. हीच ट्रेन पुण्यापर्यंत धावत असल्याने व्यापारी, प्रवासी, नोकरदार वर्गाची ती मुंबईपर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी होत होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सोडण्यात यावी, अशी पुन्हा मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच ती सकाळी मुंबईला सोडण्यात यावी, असेही सांगितले. बियाणी म्हणाले, 'टर्मिनसवरून नवीन वंदे भारत थेट मुंबईपर्यंत धावणार आहे.


खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचा परिणाम म्हणून ही रेल्वे मंजूर झाली आहे. लवकरच गाडीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.' त्यामुळे पुढील १५ दिवसांत मुंबई-कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत सध्या धावत आहे. तिचे उद्‌घाटन १६ सप्टेंबर २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. ती सोमवार, गुरुवार व शनिवार अशी तीन दिवस धावते. ती मिनी वंदे भारत २.० प्रकारातील असून, तिला एकूण ८ डबे असून तिची प्रवासी क्षमता ५५० इतकी असणार आहे. त्यात एसी चेअर कार व एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार या दोन प्रकारांच्या डब्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली