"आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट..." राम कुलकर्णी यांची विखारी टिका, रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष महिला अघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल यांना पुण्यात रेव्ह पार्टी करतांना पोलिसांनी रंगेहात पकडल्या नंतर रोहिणी खडसे यांची पदावरून हकालपट्टी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता भाजप आणि पोलिसांवरच खडसे यांचा पक्ष आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. ज्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून विखारी टीका केली.


महायुती सरकारला विरोध करायचा आणि खडसे बापलेकीला समर्थन द्यायचे म्हणून शरद पवार गटाचे व उबाठाचे नेते काहीही बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना राम कुलकर्णी यांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांबरोबरच शरद पवार राष्ट्रवादी पक्षधोरणांवर देखील प्रश्न उपस्थित केले. "जयंत पाटील पायउतार झाल्यापासून पक्षात प्रमुख भुमीका बजावणारे, सत्ताधारी पक्षावर बेछूट अरोप करत मोबाईल फूटेस्तोवर ट्विट करणारे रोहित पवार यांची दातखिळी बसली का ?" असा सवाल त्यांनी केला. तर "सुप्रिया सुळे या प्रकरणात रोहिणी खडसे यांचा राजीनामा घेतील असे वाटले पण त्यांनाही सदर प्रकरणात राजकिय वास येणे योग्य नव्हे." असे देखील त्यांनी म्हंटले.



रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी


शरद पवारांच्या पक्षात काही नैतिकता असेल तर खऱ्या अर्थाने अगोदर रोहिणी खडसे यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी करत आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट , असं राजकारण चालत नसतं असे खडसावले.

Comments
Add Comment

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे

पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला

Jaykumar Gore's Brother : भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेच्या गळाला

जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्याचे उट्टे काढणार?; १ सप्टेंबरला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

Tribal Students Demands : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांकडून मान्य, मंत्री अशोक उईके यांनी दिली माहिती

शासकीय आश्रमशाळांचे 'थर्ड पार्टी ऑडिट' होणार मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक