भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती कारवाई करत आहोत, असे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले. त्रिपाठींच्या या वक्तव्याने पाकिस्तानला धडकीच भरली असल्याचे वृत्त आहे.


मे महिन्यात पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतसह कॅरिअर बॅटल ग्रुप आक्रमक स्थितीत सज्ज ठेवला. हे बघून पाकिस्तान घाबरला, त्यांची स्वतःच्या युद्धनौका बाहेर काढण्याची हिंमतच झाली नाही. पाकिस्तानच्या युद्धनौका बंदरातच नांगर टाकून उभ्या राहिल्या. मागील सात महिन्यांपासून भारतीय नौदलाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान सतत दबावात आहे; असे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले.


'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षा आणि नौदलाच्या क्षमतेचा खास उल्लेख केला होता. याबद्दल ॲडमिरल त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी वर्षभरातील नौदलाच्या कामगिरीची माहिती आकडेवारीच्या स्वरुपात जाहीर केली.


५०,००० तास उड्डाण (फ्लाइंग) केले.


५२ समुद्री चाच्यांना (Pirates) पकडले.


समुद्रात ५२० लोकांचे जीव वाचवले.


समुद्रामध्ये ११,००० जहाज-दिवस (ship-days) घालवले.


४३,३०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले.


समुद्री चाचेगिरी विरोधी मिशनवर (Anti-Piracy Mission) ४० जहाजे पाठवली.


वेगवेगळ्या मिशनवर १३८ जहाजे तैनात केली.


१३८ युद्धनौकांनी (warships) ७,८०० व्यापारी जहाजांना (merchant vessels) सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत केली.


२००८ पासून आजपर्यंत एडनच्या आखातात (Gulf of Aden) एक जहाज नेहमीच तैनात असते.


लाल समुद्रात (Red Sea) हौथी (Houthi) हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ४० मोठी युद्धनौके तैनात केली, ज्यामुळे ५.६ अब्ज डॉलर (Billion) किमतीचा माल सुरक्षितपणे पार पडला.


ऑपरेशन सागर बंधू (Operation Sagar Bandhu) अंतर्गत श्रीलंकेला INS विक्रांत आणि INS उदयगिरीने १२ टन, तर INS सुकन्याने १०-१२ टन मदत सामग्री पोहोचवली.


गेल्या वर्षीच्या नौदल दिवसापासून (Navy Day) आतापर्यंत आम्ही १ नवीन पाणबुडी (Submarine) १२ नवीन युद्धनौका (Warships) नौदलात सामील केल्या


INS उदयगिरी भारतीय नौदलाची १०० वी युद्धनौका (Warship)


भारताचे प्रत्येक जहाज आणि देशाचा प्रत्येक नौसैनिक हा प्रत्येक क्षणी तयार असतो. ऑपरेशन सिंदूर असो वा लाल समुद्रातील हुती दहशतवाद्यांना धडा शिकवणं असो, समुद्री चाच्यांना पकडणे किंवा श्रीलंकेत मदत पोहचवणं. भारतीय नौदल आज जगातील सर्वात सतर्क, शक्तीशाली आणि मानवीय दृष्टीकोणातून सर्वात चांगल्या नौदलांपैकी एक आहे. पाकिस्तानची झोप उडाली आहे कारण त्यांना माहिती आहे की आमचा कॅरिअर बॅटल ग्रुप अजूनही अरबी समुद्रात तैनात आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही; असेही भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी