देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी

उत्तर प्रदेशही शर्यतीत पुढे


मुंबई : यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात उत्साहवर्धक झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत देशभरातील ४७९ साखर कारखान्यांनी ७७.९० लाख टन साखरेचे उत्पादन नोंदवले आहे. गेल्या वर्षी याच काळात ४७३ कारखान्यांनी फक्त ६०.७० लाख टन साखर उत्पादन केले होते. उस गळीत हंगामाने गत दीड महिन्यात मोठी गती घेतली असून, ऊस पट्ट्यात पडलेली चांगली थंडी, कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता, तसेच तोडणी-वाहतुकीचे नियोजन या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरीत राज्यांमधील ९३ कारखान्यांनी एकूण ६.०५ लाख टन साखर तयार केली आहे.


साखर उत्पादनाची स्थिती चांगली असली तरी, कारखान्यांमधील विक्री दर सरासरी ३७ रुपये प्रति किलो राहिला आहे. साखरेच्या विक्री दरातील घसरणीमुळे कारखान्यांच्या खेळत्या भांडवलावर परिणाम झाला असून, सुमारे १.३० लाख कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार, साखरेचे विक्री दर ३१ रुपयांपासून ४१ रुपयांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. इथेनॉलसाठी अतिरिक्त ५ लाख टन साखर वळविण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, "केंद्र सरकारने एफआरपी, कापणी आदींमुळे साखर उत्पादनाचा खर्च वाढल्याने थकीत रक्कम सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे."


राज्यनिहाय स्थिती अशी आहे


महाराष्ट्र : १९० कारखान्यांनी ३७९ लाख टन उसाचे गाळप करून ३१.३० लाख टन साखर उत्पादन केले आहे.


उत्तर प्रदेश : १२० कारखान्यांनी २६४ लाख टन ऊस गाळप करून २५.०५ लाख टन साखर तयार केली आहे.


कर्नाटक : ७६ कारखान्यांनी १८६ लाख टन उसाचे गाळप करून १५.५० लाख टन साखर उत्पादन केले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :