भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारताने एक असामान्य आणि चिंताजनक पॅटर्न नोंदवला आहे. बंगालच्या उपसागरात सातत्याने मोठ्या संख्येने बांगलादेशच्या मासेमारी नौका भारतीय जलसीमेत प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे.


१५ डिसेंबर रोजी हा तणाव अधिक तीव्र झाला, जेव्हा बांगलादेश नौसेनेच्या एका गस्ती जहाजाने १६ भारतीय मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॉलरला धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलर उलटला आणि मच्छिमारांचे प्राण धोक्यात आले. सुदैवाने सर्व मच्छिमारांना वाचवण्यात यश आले. ही घटना फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये भारतविरोधी वातावरण तापले असताना घडल्याने तिचे गांभीर्य अधिक वाढले आहे.


शेख हसीना सरकारच्या सत्तांतरानंतर मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारने विशेषतः बंगालच्या उपसागरात आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यूनुस यांनी यापूर्वी संपूर्ण क्षेत्रातील महासागराचा संरक्षक बांगलादेश असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यामुळे भारताच्या धोरणात्मक व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.


या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या जवळ मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी ही चिंता आणखी वाढली, जेव्हा पश्चिम बंगालमधील १६ मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या भारतीय ट्रॉलरला सीमेजवळ बांगलादेश नौसेनेच्या जहाजाने धडक दिल्याचा आरोप करण्यात आला.


संबंधित बांगलादेशी जहाजाने रात्रीच्या वेळी आपली दिवे बंद ठेवले होते. त्यामुळे भारतीय ट्रॉलरला ते जहाज वेळेत दिसले नाही आणि अपघात घडला, असा दावा केला जात आहे. या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सागरी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, भारत सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला जात असून सागरी सीमांवरील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याचा विचार सुरू आहे. या घडामोडींमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी