मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार चालवल्या जाणाऱ्या पार्सल मालवाहतूक एक्सप्रेस गाड्यांच्या १४३ फेऱ्या चालवल्या असून एप्रिल ते नोव्हेंबर मध्य रेल्वेने पार्सल आणि सामानाची वाहतूक करून १८३.८० कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जो मागील वर्षातील १३३.७० कोटी रुपयांच्या तुलनेत ३७% पेक्षा जास्त आहे. या आर्थिक वर्षात मुंबई विभागाने पार्सल महसुलात १३६.२० कोटी रुपयांसह आघाडी घेतली, जी मागील आर्थिक वर्षातील ९५.२० कोटी रुपयांच्या तुलनेत ४३% पेक्षा जास्त वाढ होती . भुसावळ विभागाने पार्सल महसुलात ९३% ची मोठी वाढ नोंदवली जी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ८.९० कोटी रुपयांवरून २०२५-२६ या आर्थिक वर्षात १७.२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली इतर विभागांकडून मिळालेल्या पार्सल महसुलामध्ये पुणे विभागाकडून २०.२० कोटी रुपये, नागपूर विभागाकडून ७.६० कोटी रुपये आणि सोलापूर विभागाकडून २.६० कोटी रुपयांचा समावेश आहे.


शेतकऱ्यांना बिहारमधील नवीन बाजारपेठांमध्ये कमी खर्चात नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीची सोय व्हावी यासाठी मध्य रेल्वेने ऑक्टोबर २०२४ मध्ये देवळाली (महाराष्ट्र) ते दानापूर (बिहार) दरम्यान 'शेतकरी समृद्धी स्पेशल' ट्रेन सुरू केली. या गाड्यांमध्ये ताज्या उत्पादनांच्या वाहतुकीसाठी पार्सल व्हॅन आहेत, ज्यामुळे कृषी लॉजिस्टिक्स आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. आतापर्यंत किसान समृद्धी स्पेशल गाड्यांच्या एकूण ६३ फेऱ्या चालवण्यात आल्या असून, त्यातून ९०४४ टनांपेक्षा जास्त पार्सलची वाहतूक करण्यात आली आहे आणि ३.२४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.


शेतकऱ्यांना बाजारपेठांमध्ये परवडणारा आणि थेट प्रवेश उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनानुसार, मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नोव्हेंबर मध्ये, सोलापूर आणि पंढरपूर (महाराष्ट्र) येथून आशियातील सर्वात मोठ्या रेशीम कोष बाजारा असलेल्या रामनगरम (कर्नाटक) येथे रेशीम कोशांच्या नवीन वस्तूची थेट वाहतूक सुरू करण्यात आली. *हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम होता, आणि आतापर्यंत मध्य रेल्वेने ५३५ पार्सलद्वारे एकूण १४,९३९ किलो रेशीम कोशांची वाहतूक केली आहे.


मध्य रेल्वेने केलेल्या सखोल विपणन आणि इतर नाविन्यपूर्ण उपायांमुळे पार्सल महसुलात मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उद्या इंदौर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जेन झी शी संवाद

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा उद्या

Prakash Abitkar : मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य

कामगिरीला मान्यता, गुणवत्तेला संधी सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन मुंबई :

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; कोकणवासीयांसाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या

Pratap Sarnaik : सरनाईकांच्या कानपिचक्यांनी... एसटीची गाडी रुळावर; ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम मुंबई : एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी

Jai Jawan Govinda Pathak : सलग 4 वेळा प्रयत्न, तरीही जय जवान अपयशी! यंदा दहीहंडीत नक्की काय बिनसले?

 मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांनी उंच मानवी

DahiHandi 2026 : मुंबईत गोविंदा अपघातांची ताजी आकडेवारी समोर; जखमी गोविंदांचा आकडा 376 वर; 286 जणांना डिस्चार्ज

मुंबई : मुंबईत (Mumbai) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची