US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी (२३ फेब्रुवारी) स्पष्ट केले. वाणिज्य मंत्रालय या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.


नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अमेरिकन टॅरिफ संदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली. व्यापार करारांबाबत भारताचा दृष्टिकोन स्पष्ट असून, भारताने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिरात (यूएई), कतार, ओमान, युरोपियन संघ आणि ब्रिटन यांच्यासोबत व्यापार करार केले आहेत, असे त्यांनी नमूद केले. पुढेही विविध देशांसोबत व्यापार करार करण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले. भारताला आपल्या अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर व्यापार करण्याची आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी मिळावी, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.


सोन्याच्या वाढत्या किमतींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, बाजारात येणारे बहुतांश सोने आयात केलेले असते. देशात मौल्यवान धातूंवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर परदेशांवर आहे. “आपल्याकडे सोने शोधणे आणि उत्खनन करण्याचे स्वतःचे पुरेसे स्रोत नाहीत. यासाठी काही पावले उचलली जात आहेत; मात्र ती देशांतर्गत मागणी भागवण्यासाठी पुरेशी नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.


देशांतर्गत वापरासाठी सोने व चांदीच्या किमतींवर जागतिक बाजारातील वाढीचा थेट परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अनेक देश, विशेषतः त्यांचे केंद्रीय बँका, मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करून साठवणूक करत आहेत. या केंद्रीय बँकांच्या खरेदीमुळेच किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.


यापूर्वी, केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आयोजित सर्वसाधारण बैठकीत वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासमवेत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाला संबोधित केले.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी