धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे. त्यामुळे शीखांच्या गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराच्या विरोधात सर्व देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.


नवी मुंबई येथे गुरु श्री तेगबहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी दिवस समागम समारंभात गुरु साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थितांशी अमित शाह यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



काय म्हणाले अमित शाह ?


आपल्या संबोधनात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांचा ३५० वा शहीदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, जो संपूर्ण भारतासाठी भाग्याचा विषय आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुरु तेगबहादूर यांचे जीवनकार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. जर नववे गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म आणि हिंदूंच्या रक्षणासाठी बलिदान दिले नसते, तर संपूर्ण जगात एकही हिंदू उरला नसता. संपूर्ण भारत आणि जगभरातील सनातन धर्माचे अनुयायी गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी यातना सहन करत आपले बलिदान दिले.





अमित शाह पुढे म्हणाले की, शीख परंपरेचा मूळ आधार एकता, बंधुत्व, सर्वसमावेशकता आणि वीरता हा राहिला आहे आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये याच तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. संत नामदेव, नरसी मेहता, कबीर, संत रविदास यांसारख्या अनेक प्रसिद्ध संतांच्या पदांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान देण्याचे काम दशम पित्याने केले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, महाराष्ट्र सरकारने अनेक समाजांना गुरु तेगबहादूर जी यांच्या विचारांशी जोडण्याचे काम केले आहे.


Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी