युद्धावर बोलण्याऐवजी राज्यसभा निवडणुकीत उबाठाची मते फुटणार नाहीत याकडे लक्ष द्या, बन यांचा राऊतांना टोला

मुंबई : महाविकास आघाडीतील भांडणे ज्यांना सोडवता येत नाहीत, राज्यसभेच्या जागेवरून तीन पक्षातील कुरघोड्या ज्यांना रोखता येत नाहीत त्या उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसा समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा या बाबत शहाजोग सल्ला देणे हास्यास्पद आहे, अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी संजय राऊतांचा समाचार घेतला. इराण-अमेरिका युद्धावर बोलण्याऐवजी संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीत उबाठा ची आणि मविआ ची मते फुटणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.


यावेळी बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत सजग असून योग्य तो निर्णय घेत असल्याने देशातील १४० कोटी जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. संवेदनशील युद्धजन्य परिस्थितीत भारतीयांचे हित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता पंतप्रधानांकडे आहे. त्यामुळे राऊत यांनी त्यांना सल्ले देण्याऐवजी महाविकास आघाडीतील सावळा गोंधळ निस्तरावा.


व्हीएसआर कंपनीबाबत जय पवार यांनी केलेले ट्विट अत्यंत गंभीर असून कंपनीकडून हलगर्जी झाली असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे बन यांनी नमूद केले.


मविआ मध्ये तिन तिघाडा काम बिघाडा


शरद पवार रुग्णालयात असताना त्यांना भेट देण्याचे सौजन्यही उद्धव ठाकरेंच्या अंगी नाही अशी टीका बन यांनी केली. राज्यसभेच्या जागेवरून तीन पक्षांतील रस्सीखेच यातून दिसून येते. राऊतांचा शरद पवारांना पाठिंबा आहे तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मात्र पवारांच्या बाजूने नाहीत. राऊत हे खाल्ल्या मीठाला जागणारे नाहीत, उबाठाचे मीठ खातात मात्र बाजू शरद पवारांची घेतात असा घणाघातही बन यांनी केला.

Comments
Add Comment

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण