'अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री होणार नाही'

जम्मू : अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र दहशतवाद संपवण्याची पाकिस्तानची इच्छा नाही. पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आय पी एस किरण बेदी यांच्यासह अनेक मान्यवरांना रामदास आठवले यांच्या हस्ते महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजक आणि रिपाइं जम्मू काश्मीर प्रदेश अध्यक्षा संध्या गुप्ता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.


दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना आगरा येथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी अटलजींची चर्चा झाली होती. तेव्हा पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात. दहशतवाद जोपर्यंत थांबवला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण सबंध स्थापन होऊ शकत नाहीत असे वाजपेयी यांनी सांगितल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ या लष्करशहाने दहशतवाद संपविण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे दहशतवाद संपवण्याची आणि भारताशी मैत्री करण्याची पाकिस्तानचीच इच्छा नाही. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.


'भारत नाही कुणाचा गुलाम,
म्हणून आम्ही करीत आहोत
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम...'


असे सांगत रामदास आठवले यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्काराने सन्मान केला. त्यात बी एस एफ; सी आर पी एफ च्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा समावेश होता. यावेळी २६/ ११ मुंबई हल्ल्यावेळी अनेकांचे प्राण वाचविणारे पोलिस सबइन्स्पेक्टर मंगेश नाईक यांचा महाराज हरिसिंह डोगरा पुरस्काराने रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी या आपल्या शिस्तप्रिय कर्तृत्वासाठी लोकप्रिय होत्या. दिल्लीत आयपीएस म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांची गाडी जेसीबीने उचलून नेऊन कारवाई केली होती. याची आठवण सांगताना रामदास आठवले यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही. विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने मोदींची विकासाची गाडी पुढे चालली आहे, अशी टिप्पणी केली. तसेच शिस्तप्रिय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून किरण बेदी यांचा महाराज हरिसिंह डोगरा पुरस्काराने गौरव केला. जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटविल्यामुळे येथील पोलिस बीएसएफ यांना अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा तुलनेने जम्मू काश्मीरमध्ये चांगली शांतता वाढत आहे. दहशतवाद कमी होत आहे. जम्मू काश्मीरमधून दहशतवाद नष्ट करायचा आहे आणि ते लवकरच केंद्र आणि राज्य सरकार परस्पर समन्वयातून करून दाखवेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी