Nitin Navin : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिला आपल्या आमदारकीचा राजीनामा

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन नवीन यांनी आज म्हणजेच सोमवार ३० मार्च रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत. या पदासाठी त्यांची १६ मार्च रोजी निवड झाली होती. राजीनाम्यासोबतच नितीन नवीन यांनी बिहारच्या जनतेसाठी भावनिक संदेश देत कार्यकर्त्यांचे आभार मानले.


नितीन नवीन यांनी सांगितले की, जानेवारी २००६ मध्ये वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षाने त्यांना पटना पश्चिम मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याची संधी दिली आणि २७ एप्रिल २००६ रोजी ते प्रथमच पटना पश्चिममधून निवडून येत त्यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यांनी लिहिले, “गेल्या २० वर्षांत माझे वडील स्वर्गीय नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांनी उभारलेला हा मतदारसंघ कुटुंबाप्रमाणे जपण्याचा, घडवण्याचा आणि विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मी नेहमीच माझ्या मतदारसंघाच्या आणि बिहारच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम केले. याचाच परिणाम म्हणून येथील देवतुल्य जनतेने मला सलग पाच वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.”


त्यांनी सांगितले की, विधानसभेच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी त्यांनी आपल्या मतदारसंघ व बिहारच्या जनतेचा आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले. “बिहार विधानसभेचा सदस्य म्हणून मला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ आमदारांकडून शिकण्याची संधी मिळाली. माझ्या मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचे समाधान मी जनता आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांमधूनच शोधले,” असे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मला बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, धोरणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता आली. यासाठी मी मुख्यमंत्री यांचे आभार मानतो.”


नितीन नवीन म्हणाले, “जनतेने मला समस्या सांगितल्या आणि त्यावरील उपायांचाही मार्ग दाखवला. कार्यकर्त्यांनी मला भाऊ, कुटुंबातील सदस्य आणि मार्गदर्शक म्हणून साथ दिली आणि आज या स्थानापर्यंत पोहोचवले. पटना आणि बिहारच्या जनतेने दिलेल्या या कुटुंबभावनेचा मी सदैव सन्मान राखेन.”त्यांनी सांगितले की, ते आज बांकीपूर मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा देत असून पक्षाने दिलेल्या नव्या जबाबदारीतूनही ते आपल्या मतदारसंघ आणि बिहारच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील. कार्यकर्ते आणि बिहारच्या जनतेसोबतचे त्यांचे नाते कायम अटूट राहील आणि त्यातून त्यांना सतत नवी ऊर्जा व प्रेरणा मिळत राहील. नितीन नवीन यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत विकसित भारत आणि विकसित बिहार घडवण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :