उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १७ राज्यांसाठी मोठा हवामान इशारा जारी केला आहे. पुढील १५ ते १६ तासांत पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, वाऱ्याचा वेग ताशी ८० ते १०० किमीपर्यंत पोहोचू शकतो. तर मात्र दुसरीकडे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप कायम राहणार आहे. (Weather Update IMD Alert)
दिल्लीत ४७°C पर्यंत तापमानाची शक्यता :
उत्तर प्रदेशात उष्णतेचा कहर :
उत्तर प्रदेशात उष्णतेने अक्षरशः नागरिक हैराण झाले आहेत. बांदा येथे तापमान ४८.२°C वर पोहोचले असून, लखनौ, कानपूर, वाराणसी आणि प्रयागराजमध्ये पुढील काही दिवस तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Update IMD Alert)
बिहारमध्ये पावसाचा अलर्ट :
बिहारमध्ये पुढील १२ तासांत हवामान बदलण्याची शक्यता आहे. पाटणा, भागलपूर आणि मुझफ्फरपूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहू शकतात.
राजस्थानमध्ये रेड अलर्ट :
हिमाचल आणि झारखंडमध्ये वादळी पावसाचा अंदाज :
हिमाचल प्रदेशात २१ ते २३ मे दरम्यान पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर झारखंडमध्ये रांची, जमशेदपूर आणि धनबाद येथे वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पंजाबमध्ये उष्णतेसोबत धुळीची वादळे :
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा :
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये हवामान खराब राहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Weather Update IMD Alert)