Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्ष भडकला; भारताने संवादातून तोडगा काढण्याची केली मागणी

नवी दिल्ली : पश्चिम आशिया आणि खाडी प्रदेशातील तणाव वाढल्यानंतर भारताने सोमवारी पुन्हा एकदा संघर्ष तातडीने कमी करण्याचे तसेच संवादाच्या माध्यमातून तोडगा काढून या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, १०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर मानवी हालअपेष्टा निर्माण झाल्या असून जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. (Israel-Iran Conflict)


परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम आशियात पुन्हा सुरू झालेल्या हल्ल्यांबद्दल भारताला तीव्र खेद आहे. या घडामोडी संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी गंभीर चिंतेचा विषय आहेत. हा संघर्ष आता १०० दिवसांहून अधिक काळ सुरू असून त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर मानवी दुःख आणि नुकसान झाले आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा पुरवठा व्यवस्थेवरही त्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. (Israel-Iran Conflict)



निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत सर्व संबंधित पक्षांना तात्काळ तणाव कमी करण्याचे, सामान्य नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आणि शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्याचे आवाहन करतो, जेणेकरून या प्रदेशात पुन्हा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकेल. (Israel-Iran Conflict)


शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी नवी दिल्लीकडून करण्यात आलेले हे आवाहन गेल्या २४ तासांत वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. या काळात अनेक शहरांमध्ये लष्करी चकमकी, धोरणात्मक ठिकाणांवरील हवाई हल्ले आणि संपूर्ण प्रदेशात तीव्र गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. (Israel-Iran Conflict)



पश्चिम आशियातील तणावात मोठी वाढ झालेल्या परिस्थितीत, इस्रायल आणि इराण यांनी सोमवारी एकमेकांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आधीच नाजूक स्थितीत असलेला युद्धविराम गंभीर धोक्यात आला असून संपूर्ण प्रदेशात व्यापक युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Israel-Iran Conflict)

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी