Tamil Nadu : तामिळनाडूत अमोनिया गॅस गळती; ७ कामगारांचा मृत्यू

चेन्नई : तिरुवल्लूर जिल्ह्यातील (तामिळनाडू) पेरियापालयमजवळील कनिगईपायर गावात असलेल्या सेंट पीटर्स अँड पॉल सीफूड्स एक्सपोर्ट्स या समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योगात अमोनिया वायूची गळती होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला असून ६७ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी सात जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रावर ठेवण्यात आले आहे.



तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या कारखान्यामध्ये कोळंबीवर प्रक्रिया करण्याचे काम केले जात असे. या दुर्घटनेनंतर कामगारांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी या घटनेच्या चौकशीसाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या समितीला २४ तासांत अंतरिम अहवाल आणि पुढील ३ दिवसांत अंतिम अहवाल सोपवण्याची सूचना देण्यात आली आहे.



तिरुवल्लूर जिल्हाधिकारी एस. कविता यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायूगळतीमुळे बाधित झालेल्या सर्व कामगारांना तातडीने जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये हलविण्यात आले. त्यापैकी ४६ जणांवर वेल्स रुग्णालयात, तर २१ जणांवर वेंकटेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर प्रशासन, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.



या उद्योगातील बहुतांश कामगार उत्तर भारतातील विविध राज्यांमधून रोजगारासाठी येथे आलेले असल्याचे सांगितले जात आहे. अमोनिया वायूचा संपर्क आल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही कामगारांना चक्कर येणे, मळमळणे आणि उलट्यांसारखी लक्षणे दिसून आली. त्यानंतर सर्व बाधितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेनंतरच्या छायाचित्रांमध्ये कामगारांना रुग्णवाहिकांमधून उद्योग परिसरातून बाहेर काढून उपचारासाठी नेले जात असल्याचे दिसून आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या शवविच्छेदनाबाबत विचारविनिमय सुरू आहे.



दरम्यान, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. लोकभवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, पेरियापालयमजवळील कनिगईपायर गावातील कोळंबी प्रक्रिया उद्योगात झालेल्या अमोनिया वायूगळतीच्या दुर्घटनेमुळे अनेक निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे.



राज्यपालांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त करताना या कठीण काळात त्यांना धैर्य लाभावे अशी प्रार्थना केली. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व जखमी कामगारांच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठीही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


हाती आलेल्या माहितीनुसार, तामीळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या पेरियपालयम जवळ कनिगईपैरमध्ये 'सेंट पीटर्स पॉल सीफूड एक्सपोर्ट्स'च्या प्रकल्पात अमोनिया गळती झाली. अमोनिया गळती झल्याचे लक्षात येताच प्रकल्प व्यवस्थापनाने अरक्कोणम येथील एनडीआरएफच्या टीमशी तातडीने संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अरक्कोणम येथील एनडीआरएफची एक टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. एनडीआरएफच्या सदस्यांनी त्यांच्या मुख्यालयाशी संपर्क साधून चौथ्या क्रमांकाची बटालियन घटनास्थळी तातडीने पोहोचेल अशी व्यवस्था केली. घटनास्थळी एनडीआरएफच्या मार्गदर्शनात मदतकार्य सुरू आहे.





Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी