Indian Navy : भारताच्या नौदल ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांचा समावेश वाढती क्षमता, आत्मनिर्भरता, आधुनिकीकरणाचे प्रतीक

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत रविवारी एकाच वेळी तीन अत्याधुनिक स्वदेशी जहाजांचा नौदल ताफ्यात समावेश करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक ही तीन जहाजे राष्ट्राला समर्पित केली. या तिन्ही जहाजांच्या समावेशामुळे भारताची सागरी सुरक्षा, देखरेख आणि युद्धक्षमता अधिक मजबूत होणार आहे.



आयएनएस संशोधक हे भारतीय नौदलाचे अत्याधुनिक सर्वेक्षण जहाज असून ते ‘संधायक’ श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज आहे. खोल समुद्र तसेच किनारी भागांतील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी हे जहाज विशेष तयार करण्यात आले आहे. कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स येथे तयार करण्यात आलेल्या या जहाजात ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल साइड-स्कॅन सोनार आणि स्वायत्त पाण्याखालील वाहनांसारख्या अत्याधुनिक उपकरणांनी ते सज्ज आहे. सुमारे ३,४०० टन वजनाचे हे जहाज शोध आणि बचाव मोहिमांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.



आयएनएस दुनागिरी हे प्रोजेक्ट १७ए (नीलगिरी श्रेणी) अंतर्गत तयार करण्यात आलेले पाचवे स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौक आहे. या जहाजावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो, मध्यम पल्ल्याची पृष्ठभाग-ते-हवा क्षेपणास्त्र प्रणाली तसेच पाणबुडीविरोधी रॉकेट प्रणाली बसवण्यात आली आहे. सुमारे ७५ टक्के स्वदेशी साहित्याने तयार झालेल्या या युद्धनौकेला उत्तराखंडमधील दुनागिरी शिखराचे नाव देण्यात आले आहे. हे जहाज हवाई, सागरी आणि पाण्याखालील धोक्यांचा सामना करण्यास सक्षम आहे. आयएनएस अग्रय हे अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौक असून उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांचा नाश करण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे.



या जहाजाची निर्मितीही गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स येथे झाली असून, त्यात ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्य वापरण्यात आले आहे. सुमारे ७७ मीटर लांबीचे हे जहाज वॉटरजेट प्रणालीवर चालते. हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि अत्याधुनिक सोनार प्रणालीमुळे त्याची क्षमता वाढली आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी या तिन्ही जहाजांच्या समावेशाचे स्वागत करताना सांगितले की, ही कामगिरी भारताच्या युद्धनौका निर्मितीतील आत्मनिर्भरता, आधुनिकीकरण आणि वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे. कोलकात्यातील हे दुसरे ‘ट्राय-कमिशनिंग’ असून, भारतीय नौदलाच्या भविष्यातील सागरी मोहिमांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी