Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026) परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) भाविकांसाठी महत्त्वाची सूचना (अॅडव्हायझरी) जारी केली आहे. नेपाळमध्ये अनेक भारतीय भाविक अडकल्याच्या घटनांनंतर मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, चीनमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेला व्हिसा आणि परवाने (परमिट) नसताना यात्रा सुरू करणे गंभीर अडचणींचे कारण ठरू शकते. मंत्रालयाने भाविकांना केवळ अधिकृत टूर ऑपरेटरमार्फतच यात्रा करण्याचे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतरच घरातून प्रस्थान करण्याचे आवाहन केले आहे. (Kailash Mansarovar Yatra 2026)


परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, नेपाळमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय नागरिकांकडून मदतीच्या विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. हे भाविक खासगी टूर ऑपरेटरमार्फत कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. मात्र, त्यांच्याकडे चीनमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेला व्हिसा आणि परवानगीपत्रे नव्हती. आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांना पुढील प्रवास सुरू ठेवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण यात्रेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे हाती आल्यानंतरच भारतातून प्रवास सुरू करावा. पुढे जाऊन व्हिसा किंवा परवानगी मिळेल, या आशेवर यात्रा सुरू केल्यास भाविक अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरच यात्रेला सुरुवात करावी. (Kailash Mansarovar Yatra 2026)


परराष्ट्र मंत्रालयाने भाविकांना यात्रा बुक करण्यापूर्वी संबंधित टूर ऑपरेटर विधिवत नोंदणीकृत आणि अधिकृत असल्याची खात्री करण्याचा सल्ला दिला आहे. अधिकृत टूर ऑपरेटरमार्फत प्रवास केल्यास कागदपत्रांची प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण होते आणि प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा अनावश्यक जोखमीपासून बचाव होतो. (Kailash Mansarovar Yatra 2026)



कोरोना महामारी आणि भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०२० पासून बंद असलेली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांनंतर २०२५ मध्ये पुन्हा सुरू झाली आहे.यंदा सलग दुसऱ्या वर्षी २०२६ मध्येही ही यात्रा सुरू आहे. (Kailash Mansarovar Yatra 2026)


परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदाची यात्रा ४ जुलै ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पडत आहे. यात्रा दोन पारंपरिक मार्गांद्वारे आयोजित करण्यात आली आहे. पहिला मार्ग उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून, तर दुसरा मार्ग सिक्कीममधील नाथू ला खिंडीतून जातो. या यात्रेची पुनर्बहाली भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. यंदा कैलास मानसरोवर यात्रेसाठी एकूण ५,५६१ जणांनी अर्ज केले होते. परराष्ट्र मंत्रालयाने संगणकीकृत लॉटरी पद्धतीद्वारे ७५० भाविकांची निवड केली आहे. (Kailash Mansarovar Yatra 2026)


यात्रेसाठी एकूण १५ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी प्रत्येकी ५० भाविकांच्या पाच तुकड्या उत्तराखंडमधील लिपुलेख मार्गाने, तर प्रत्येकी ५० भाविकांच्या दहा तुकड्या सिक्कीममधील नाथू ला मार्गाने यात्रा करणार आहेत.दोन्ही मार्गांवर पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पायी चालण्याचे अंतरही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. (Kailash Mansarovar Yatra 2026)



कैलास मानसरोवर यात्रा हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे भारत-चीन संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळेही यात्रा पुन्हा सुरू होऊ शकली नव्हती. यंदा यात्रेची पुनर्बहाली ही केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे, तर भारत आणि चीन यांच्यातील परस्पर विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी केवळ अधिकृत माध्यमातूनच यात्रा करावी आणि चीनमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले सर्व व्हिसा व परवाने प्राप्त झाल्यानंतरच प्रवासाला सुरुवात करावी. (Kailash Mansarovar Yatra 2026)

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी