Navnath Ban : 'देवेंद्र फडणवीस लवकरच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करतील'; भाजपचे नवनाथ बन यांचा दावा

मुंबई :  भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे नेते ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Navnath Ban)



नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले असून, जनतेच्या पाठिंब्यामुळे भविष्यात ते अव्वल स्थान गाठतील. राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे त्यांना सातत्याने जनतेचा आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ( CM Devendra Fadnavis)


यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळातील अटल सेतू, मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या निर्णयांचा उल्लेख केला. तसेच विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका केली.



लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि काँग्रेसवर निशाणा साधत, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीत दिलेले दरमहा २१०० रुपयांचे आश्वासनही सरकार पूर्ण करेल, असे ते म्हणाले.


राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांवर टीका करत, समाजवादी पक्ष आणि काँग्रेससोबतची युती करताना उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. (Maharashtra Politics)


याशिवाय, शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केल्याचा उल्लेख करत, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष राजकीयदृष्ट्या एकटा पडत असल्याचाही दावा नवनाथ बन यांनी केला. (Politics)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली