Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित केलेली 'चार धाम यात्रा' आता सुरळीतपणे पुन्हा सुरू झाली आहे. गढ़वाल आयुक्त आनंद स्वरूप यांनी सांगितले की, सर्व चार धाम जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने ही यात्रा सुरू आहे. यात्रेच्या मार्गांवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, संवेदनशील भागांमध्ये विशेष सतर्कता बाळगली जात आहे, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.(Chardham Yatra)



मुसळधार पाऊस, दरड कोसळणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मार्ग तात्पुरता विस्कळीत झाल्यास, यात्रेकरूंनी प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित ठिकाणी किंवा होल्डिंग एरियामध्ये थांबावे आणि प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच प्रवासाला पुन्हा परवानगी दिली जाईल. यात्रेकरूंची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे गडवाल आयुक्तांनी आवर्जून सांगितले. हवामानाची परिस्थिती आणि यात्रेच्या मार्गांवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना देण्यात आले आहेत, जेणेकरून गरज भासल्यास तातडीने कारवाई करता येईल. प्रवासाला निघण्यापूर्वी हवामानाचा नवीन अंदाज तपासून पहावा आणि केवळ प्रशासनाच्या अधिकृत सल्ल्यांवरच विश्वास ठेवावा, असा सल्ला यात्रेकरूंना देण्यात आला आहे.



यापूर्वी, सतत मुसळधार पाऊस, हवामान खात्याने जारी केलेले रेड व ऑरेंज अलर्ट आणि यात्रेच्या मार्गावरील विविध ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे, सुरक्षेचा उपाय म्हणून उत्तराखंड प्रशासनाने सोमवारी चार धाम यात्रा तात्पुरती स्थगित केली होती. मार्गावर आधीच असलेल्या यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी उतरवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तसेच मार्ग पूर्णपणे सुरक्षित घोषित केल्यानंतरच त्यांना पुढील प्रवासाला परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. माध्यमांद्वारे यात्रेकरूंना आणि जनतेला वेळेवर व अचूक माहिती देण्यासही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते.(News)



अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन



हवामानाची सद्यस्थिती आणि मार्गांची अवस्था पाहता, यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय पूर्णपणे सावधगिरीचा उपाय म्हणून घेण्यात आला होता. मार्ग सुरक्षित घोषित झाल्यानंतर आणि परिस्थिती सामान्य झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात्रेकरूंनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनेवरच अवलंबून राहावे आणि हवामान सुधारत नाही तोपर्यंत संबंधित जिल्हा प्राधिकरणाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी