India on POK Election : PoK निवडणुकांवर भारताचा पाकिस्तानला खरमरीत इशारा! 'हा बेकायदेशीर ताबा लपवण्याचा केवळ बनाव'

नवी दिल्ली : पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये आयोजित केलेल्या कथित विधानसभा निवडणुकांवर भारताने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. या निवडणुकांचा भारताने तीव्र निषेध करत, हा संपूर्ण प्रकार पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्याला वैधतेचा आभास निर्माण करण्याचा निष्फळ प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे. (India on POK Election)


परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली. जम्मू-काश्मीर आणि लडाखसह संपूर्ण केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अविभक्त भाग असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.



'निवडणुका म्हणजे केवळ दिखावा' :


रणधीर जयस्वाल म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून घेतल्या जाणाऱ्या कथित विधानसभा निवडणुका या लोकशाही प्रक्रियेचा भाग नसून, त्या केवळ एक "दिखावा आणि बनाव" आहेत. या माध्यमातून पाकिस्तान त्या प्रदेशावरील आपला बेकायदेशीर ताबा लपवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आरोप केला की, पाकिस्तान या निवडणुकांच्या आडून त्या भागातील मानवाधिकारांचे उल्लंघन, नागरिकांवरील दडपशाही आणि लोकशाही हक्कांचे हनन यांसारख्या गंभीर प्रश्नांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. (India on POK Election)



'PoK मधील आंदोलने पाकिस्तानच्या धोरणांचेच परिणाम' :


परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेली आंदोलने ही तेथील नागरिकांच्या असंतोषाचे प्रतीक आहेत. आर्थिक शोषण, विकासाचा अभाव, मूलभूत अधिकारांचे हनन आणि प्रशासकीय दडपशाही यामुळे तेथील नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. (India on POK Election)



भारताची भूमिका कायम :


भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीर कब्जा संपवून तो भाग रिकामा करावा. तसेच, त्या प्रदेशात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निवडणुका किंवा राजकीय प्रक्रिया भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम करू शकत नाहीत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले. भारताची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट असून, जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कथित निवडणुकांना भारताने कोणतीही वैधता मान्य नसल्याचे पुन्हा अधोरेखित करण्यात आले. (India on POK Election)

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी