Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार


मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजपच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत १० ऑगस्ट रोजी मुंबईत एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सुमारे २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः रस्त्यावर उतरून रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. (BJP)


९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक रॅली पार पडतील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी आपापल्या संपर्क क्षेत्रातील रॅलींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांसह सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. या मोहिमेत विविध सामाजिक संस्था, मित्रपक्ष आणि समविचारी संघटनांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. मुंबईत १० ऑगस्ट रोजी निघणारी रॅली या संपूर्ण अभियानाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. (Tiranga Rally)



गेल्या काही दिवसांत 'नीट'सह विविध शैक्षणिक मुद्द्यांवरून देशपातळीवर तरुण वर्गाकडून आंदोलने उभी राहिली होती. या पार्श्वभूमीवर, तरुणांमधील असंतोष दूर सारून त्यांना पुन्हा पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी भाजपने या 'तिरंगा रॅली'चे नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी राजकीय आव्हाने लक्षात घेता स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि देशभक्तीच्या भावनेच्या माध्यमातून तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडून घेण्याची ही रणनीती मानली जात आहे. (Independence Day)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली