Visa Layoffs: AI मुळे Visa मध्ये 2,600 कर्मचाऱ्यांची कपात; भारतातील शेकडो कर्मचाऱ्यांवर परिणामाची शक्यता

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावर नोकरी कपातीचे प्रमाण वाढत असताना आता पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी Visa नेही मोठी कर्मचारी कपात केली आहे. AI-आधारित कार्यक्षमता वाढवण्याच्या (Efficiency Drive) धोरणाअंतर्गत कंपनीने जगभरातील सुमारे 2,600 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 7 टक्के आहे. या कपातीचा फटका भारतातील कर्मचाऱ्यांनाही बसल्याची माहिती समोर येत आहे. (LayOffs)


मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना नोकरी संपुष्टात आल्याचे ई-मेल मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसांत संबंधित कर्मचाऱ्यांचा कंपनीच्या प्रणालींवरील प्रवेशही बंद करण्यात आला. बेंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथील Visa कार्यालयांमधील अनेक कर्मचारी या प्रक्रियेमुळे प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे. ( Visa Layoffs)



भारतात किती कर्मचारी प्रभावित?


भारतातील किती कर्मचाऱ्यांची नोकरी गेली याबाबत कंपनीने अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील काही दाव्यांनुसार, बेंगळुरूतील Visa च्या टेक्नॉलॉजी सेंटरमधील सुमारे 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. भारतात Visa चे सुमारे 3,500 कर्मचारी असून, कपात झालेल्यांमध्ये अंदाजे 500 अभियंते आणि 900 इतर विभागांतील कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. या आकडेवारीला कंपनीकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.



AI मुळे का झाली कर्मचारी कपात?


कंपनीने स्पष्ट केले आहे की, ही कर्मचारी कपात आर्थिक अडचणीमुळे नसून, भविष्यात अधिक वाढीची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये संसाधने वळवण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन मॅकइनर्नी यांच्या मते, AI मुळे काम करण्याची पद्धत झपाट्याने बदलत असून Visa देखील त्या बदलाशी जुळवून घेत आहे. ( AI Job Loss)



'Agentic AI' कडे कंपनीचा कल


या पुनर्रचनेमागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे Visa आता पारंपरिक AI साधनांऐवजी 'Agentic AI' तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे. हे AI सिस्टम मानवी हस्तक्षेप किंवा सततच्या देखरेखीशिवाय स्वतंत्रपणे अनेक कामे पार पाडू शकतात. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्या अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करत असून, त्याचा परिणाम काही पारंपरिक नोकऱ्यांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी