PM Modi IIT Delhi Convocation : "मी काय बाबा बागेश्वर नाही..."; IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात PM मोदींचं मिश्कील वक्तव्य

नवी दिल्ली : आयआयटी दिल्ली (IIT Delhi) च्या ५७ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावत पदवीधरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत विद्यार्थ्यांना संबोधित केले. "आज दीक्षांत समारंभाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याबद्दल नक्कीच काहीतरी विचार सुरू असतील. मी काय बाबा बागेश्वर नाही, पण तरीही तुमच्या मनात काय चाललंय याचा अंदाज लावू शकतो," असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पहिली नोकरी, पहिला पगार, स्वतःचा स्टार्टअप की स्पर्धा परीक्षा, अशा विविध स्वप्नांची चित्रे सध्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर तरळत असल्याचे त्यांनी नमूद केले.



तंत्रज्ञानामुळे जग अत्यंत वेगाने बदलत असून पुढील २० ते ३० वर्षांत जागतिक व्यवस्था कशी असेल याचा अचूक अंदाज बांधणे कठीण असल्याचे सांगत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत राहण्याचा (Continuous Learning) सल्ला दिला. बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी हीच एकमेव गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, यंदाच्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक आणि इतर पदके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच, पदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या आणखी वाढायला हवी होती, अशी आपुलकीची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.





आपल्या भाषणात देशाच्या विकासातील युवा पिढीच्या भूमिकेवर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक पिढीचे एक राष्ट्रीय कर्तव्य असते. स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला, तर आजच्या पिढीवर 'विकसित भारत' घडवण्याची मोठी जबाबदारी आहे. आगामी ३० ते ३५ वर्षांत विद्यार्थी जे काही काम करतील किंवा निर्णय घेतील, त्याचा थेट परिणाम देशाच्या प्रगतीवर होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्यातून देशाचा काय फायदा होईल, याचा विचार करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी